महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंदस्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; ४ आरोपी ताब्यात, ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव | लोकविचार
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून तब्बल ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पोस्टे तुळजापूर हद्दीतील तुळजाभवानी मंदिर परिसरात दि. ०९ मे २०२६ रोजी भाविक महिलांच्या गळ्यातील गंठण चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी पोस्टे तुळजापूर येथे गुन्हा क्रमांक २१०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये अज्ञात महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारचे काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यात वाढत असल्याने आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींना तातडीने जेरबंद करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार दि. १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कासार व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्याआधारे पारगाव टोल नाका, वाशी येथे सापळा रचून दोन महिलांसह दोन पुरुषांना त्यांच्या स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेण्यात आले.पोलीसांनी चौकशी केली असता आरोपींनी तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे पोस्टे तुळजापूर येथील १ आणि पोस्टे येरमाळा येथील ३ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अनिता सुनील शिंदे,हिराबाई रमेश शिंदे,चिरंजीव रमेश शिंदे,किरण शेरराव शिंदे(सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना) यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे,
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहे शौकत पठाण, पोहे जावेद काझी, पोहे फरहान पठाण, मपोहे शोभा बांगर, मपोका बहिरवाड (पोस्टे वाशी), पोहे रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786


