• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 7, 2026
in कृषी
0
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

चार वेळा निवेदने देऊनही प्रशासनाला जाग नाही; पिंपळा (बु.) येथील शेतकऱ्याचा गंभीर आरोप

धाराशिव Lokvichar – लोकविचार

महसूल विभागाच्या कथित गलथान कारभारामुळे एका शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावरून तब्बल २८ गुंठे जमीन कमी झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) येथील शेतकरी गुलाब मेहबूब शेख यांनी याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनेकवेळा निवेदने देऊनही न्याय मिळाला नसल्याने कुटुंबासह आज ७ जुलै २०२६ रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

शेतकरी गुलाब शेख यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या गट क्रमांक १४अ आणि १४ब मधून प्रत्यक्षात कोणताही कालवा गेलेला नसतानाही सन २०१३ मधील फेरफार क्रमांक १०८८ च्या आधारे त्यांच्या ७/१२ उताऱ्यावरून २८ गुंठे क्षेत्र कमी करण्यात आले. मात्र, या संपादनाबाबत त्यांना कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातून आजपर्यंत कालवाही गेलेला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

याप्रकरणी त्यांनी १७ ऑक्टोबर २०२५, ११ डिसेंबर २०२५, १९ जानेवारी २०२६ आणि १२ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज दिले. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शेख यांनी आपल्या निवेदनात महसूल विभागाच्या अनेक त्रुटींकडे बोट ठेवले आहे. फेरफार क्रमांक १०८८ मध्ये गट क्रमांक १४अ आणि १४ब असा स्पष्ट उल्लेख नसून केवळ गट क्रमांक १४ असा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे संपादनाची नोंद एका व्यक्तीच्या नावावरच करण्यात आली असून इतर हक्कधारकांच्या नावावरील क्षेत्राचा विचारच करण्यात आला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याप्रकरणी सरकारी मोजणी करून प्रत्यक्षात कालवा नसल्याचे सिद्ध झाल्यास ७/१२ वरील चुकीची नोंद तात्काळ दुरुस्त करावी आणि कमी करण्यात आलेले २८ गुंठे क्षेत्र पूर्ववत करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी महसूल विभागाचे उंबरठे झिजवूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याने आता आमरण उपोषणाशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेख यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, “महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर?” असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासन या गंभीर आरोपांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार अमित देशमुखआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजीतसिंह पाटील तुळजापूर भारतीय जनता पक्ष आई तुळजाभवानी बीजेपी भाजपाउस्मानाबादखासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

शिवसेना नेते अमोल जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश तुळजापूर आगाराला मिळाल्या पाच नवीन एसटी बस

Next Post

“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

Next Post
“‘कधी आहे प्रवेश” जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण”

"‘कधी आहे प्रवेश" जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या व्हॉट्सअॅप कमेंटची जोरदार चर्चा, कैलास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण"

Recent Posts

  • येडशी–टेंभुर्णी चौपदरीकरणाला तीन महिन्यांत मंजुरी त्यानंतर तातडीने निविदा प्रक्रिया – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ग्वाही
  • धक्कादायक! पत्नीने प्रियकराच्या मदतीने घडवून आणला नवऱ्याचा खून! ग्रामीण पोलिसांचा अवघ्या काही तासांत उलगडा
  • कळंबमध्ये अनैतिक देहव्यवसायावर पोलिसांचा छापा प्रभात लॉजमधून दोन महिलांची सुटका, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद धाराशिव बसस्थानकात विभाग नियंत्रक पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण
  • एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ; “झाडे लावा, झाडे जगवा”चा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा संदेश

Recent Comments

  1. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Randy WebDev on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.