ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे यांना ‘अंबरनाथ गौरव पुरस्कार’ जाहीर गेली ३८ वर्षे समाजकार्यात अविरत योगदान; २३ मे रोजी अंबरनाथ येथे होणार सन्मान,
नळदुर्ग प्रतिनिधी, अझहर शेख
परिवर्तन सामाजिक संस्था, नळदुर्ग चे संस्थापक सचिव, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे धाराशिव जिल्हा संघटक आणि ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ विजेते मारुती बनसोडे यांना यावर्षीचा प्रतिष्ठित अंबरनाथ गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
‘अंबरनाथ टाईम्स’ समूहाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार त्यांच्या प्रदीर्घ आणि निस्पृह सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी प्रदान करण्यात येणार आहे.३८ वर्षांचा संघर्षमयी आणि प्रेरणादायी प्रवास मूळचे बोरगाव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव येथील रहिवासी असलेले मारुती बनसोडे हे गेली ३८ वर्षे सातत्याने सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत तब्बल १० वर्षे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पुढे नेण्यासाठी त्यांनी १९९६ मध्ये ‘परिवर्तन सामाजिक संस्था, बोरगाव’ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे विविध सामाजिक प्रश्नांवर काम सुरू आहे.
पोतराज प्रथा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन, जलसंधारण, ग्रामविकास, तसेच विधवा, निराधार, परित्यक्ता आणि एकल महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी मोठे आंदोलन व रचनात्मक कार्य उभे केले आहे.पुरस्कारांची सुवर्णमालिकामारुती बनसोडे यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर सातत्याने घेतली गेली आहे. त्यांना आतापर्यंत अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे,
राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार महाराष्ट्र शासन संस्थात्मक लोकशाही मित्र पुरस्कार राज्य निवडणूक आयोग भीमपुत्र आयडॉल २०२५ पुरस्कारइतर महत्त्वाचे पुरस्कार नेहरू युवा पुरस्कार, कल्पना चावला वैज्ञानिक पुरस्कार, कोकण दीप पुरस्कार, भिमरत्न पुरस्कार आता यामध्ये मानाच्या अंबरनाथ गौरव पुरस्कारा’ची भर पडली आहे.
भव्य सोहळ्यात होणार वितरण हा गौरव सोहळा २३ मे रोजी अंबरनाथ येथे एका भव्य आणि दिमाखदार कार्यक्रमात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मारुती बनसोडे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


