• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 8, 2026
in महाराष्ट्र
0
सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सीएनजी तुटवड्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लागल्या रांगा !अपघाताचा धोका वाढला अन् प्रशासनाचे दुर्लक्ष

धाराशिव शहरातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या वरूडा उड्डाण पुलाजवळील श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपावर वाहनात इंधन भरण्यासाठी महामार्गावर मोठ्या रांगा लागत आहेत. या पंपावर सतत सीएनजीचा तुटवडा भासत असून वाहनधारकांना दोन-दोन तास रांगेत उभे राहून गॅस भरावा लागत आहे. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.श्रीराम हायवे सर्विसेस सीएनजी व पेट्रोल पंपा सोलापूर-धुळे राष्ट्रीय मार्गावर असल्यामुळे दूरवरून अनेक वाहनधारक येतात‌. त्यामुळे वाहनांचीही मोठी गर्दी होत आहे. सीएनजी भरण्यासाठी लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे महामार्गावर अनेक किलो मीटरपर्यंत वाहनांची साखळी तयार होत आहे. त्यामुळे वरूडा उड्डाण पुलाजवळ धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. महत्त्वाचे म्हणजेउड्डाण पुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे जर एखाद्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास खाली उभ्या असलेल्या वाहनांवर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एखादे वाहन उभ्या असलेल्या वाहनांवर आदळले व त्यातील गॅसचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. उड्डाण पुलालगत असलेल्या सर्व्हिस रोडवरही देखील वाहन चालवताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांना बसत आहे.

या पंपावर मोठ्या प्रमाणात वाहन गॅस भरण्यासाठी येत असल्यामुळे वाहनाची पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे पंपचालकाने स्वतःची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याऐवजी पंपाच्या परिसरातच व्यवस्थित व नियंत्रित राहण्यास मदत होईल.

जिल्हा प्रशासन या गंभीर समस्यकडे अक्षम्य दुर्लक्ष का करीत आहे ? शहरालगत असल्यामुळे नागरिकांची वाहने या मार्गावरून सातत्याने ये-जा करतात. शिवाय अनेक वेळा इतर कारणावरून देखील या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे वाहनधारकांना तसेच प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लवकर न सोडविल्यास भविष्यात अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

Next Post

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

Next Post
खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

खोटी ओळख, अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; धाराशिव जिल्ह्यातील वादग्रस्त कला केंद्रे पुन्हा चर्चेत

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.