नळदुर्गकरांना मोठा दिलासा! २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित!
शेकडो कुटुंबांचे घराचे स्वप्न साकारणार; नगरपालिकेचे नागरिकांना अर्जाचे आवाहन
नळदुर्ग (प्रतिनिधी)अझहर शेख नळदुर्ग शहरातील शेकडो कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत आनंदाची बातमी दिली आहे. १ जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी शासकीय जमिनीवर झालेली निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शहरातील वसंतनगर, इंदिरानगर, बुद्धनगर आणि भीमनगर या भागांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे.प्रमुख ठळक वैशिष्ट्ये,कोणाला लाभ मिळणार केवळनिवासी वापरासाठी केलेली अतिक्रमणेच नियमित केली जातील. व्यावसायिक अतिक्रमणांना या योजनेत स्थान नाही. ५०० चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण पूर्णपणे विनाशुल्क नियमित केले जाईल. त्यापुढे १५०० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे, जागा नियमित झाल्यानंतर संबंधित लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजना आणि *रमाई आवास योजनेचा* लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत,या सवलतीचा लाभ घेण्यासाठी खालील पुराव्यांची आवश्यकता असेल, मतदार यादीतील नाव वीज बिल व मालमत्ता कर पावती नगरपालिकेतील ८-अ उतारा अतिक्रमण सर्वेक्षण नोंदवही व घराचे छायाचित्र शपथपत्र एका कुटुंबाला राज्यात फक्त एकच अतिक्रमण नियमित करता येईलनियमित केलेली जागा पुढील पाच वर्षांपर्यंत विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही. तसेच सार्वजनिक रस्ते, नाले, वनक्षेत्र, जलस्रोत आणि शासकीय आरक्षित जागांवरील अतिक्रमणे नियमित केली जाणार नाहीत.नगरपालिकेचे नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी सर्व पात्र लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी निर्धारित कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह नळदुर्ग नगरपालिका कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


