नळदुर्गच्या वैभवात पडणार भर: वसंतराव नाईक यांच्या भव्य स्मारकाची आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून पाहणी
नळदुर्ग (प्रतिनिधी)अझहर शेख: आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते आणि हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नळदुर्ग येथील गोलाई चौकात (राष्ट्रीय महामार्गक्रमांक 65) उभारण्यात येत असलेले भव्य स्मारक शहराच्या सौंदर्यात आणि लौकिकात मोठी भर घालणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. कामाच्या दर्जाबाबत व गतीबाबत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश,या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार महोदयांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. “हे स्मारक नळदुर्ग शहराच्या वैभवात भर घालणारे ठरेलच, पण त्यासोबतच ते हरितक्रांतीच्या प्रेरणादायीइतिहासाची साक्ष देणारे आणि भावी पिढ्यांना मार्गदर्शन करणारे ऊर्जास्थान ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.हे काम अधिक भव्य, दर्जेदार आणि विहित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी नगराध्यक्ष व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.या पाहणीच्या वेळी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये.सिद्धेश्वर कोरे (सभापती, जिल्हा परिषद) बसवराज अप्पा धरणे(नगराध्यक्ष). नय्यर पाशा जहागीरदार(उपनगराध्यक्ष)नळदुर्ग शहर, दीपक आलुरे, बांधकाम सभापती.पांडू तात्या पुदाले.आशिष सोनटक्के,विलास राठोड, भिवाजी इंगोले, विजय शिंगाडे, . बबन चौधरी, अंगद जाधव आणि इतर प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. हे स्मारक केवळ एक बांधकाम नसून, आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत वसंतराव नाईक साहेबांनी दिलेल्या योगदानाचे जिवंत प्रतीक असेल.” —आ. राणाजगजितसिंह पाटील राष्ट्रीय महामार्गावर उभारले जाणारे हे भव्य स्मारक पर्यटनाच्या आणि शहराच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असून, आमदार पाटील यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



