हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद च्या सामुदायीक विवाह सोहळ्यात १२ जोडप्यांनी बांधल्या रेशीम गाठी
धाराशिव (उस्मानाबाद ) हजरत खाजा शमशोद्दीन गाजी रहे. वेल्फेअर सोसायटी उस्मानाबादच्या वतीने या सामुदायीक विवाह सोहळ्याचे १८ वर्षांपासून आयोजन केले जात आहे रविवार१९ एप्रिल रोजी सायंकाळी हजरत खाजा शमशोदीन गाजी दर्गा मैदानात विवाह सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला . सोसायटीचे अध्यक्ष सय्यद नादेरूल्ला हुसैनी सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व सर्व सन्माननीय सदस्य , मौलाना , डॉक्टर , इंजीनियर्स सामाजीक कार्यकर्ते व वन्हाडी मंडळी यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला . या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना ५० हजार रुपयापर्यंत संसारोपयोगी साहित्य गेल्या १८ वर्षांपासून प्रदान केले जाते, तसेच सर्व वऱ्हाडी मंडळीस स्त्रि /पुरुष स्वतंत्र भोजन व्यवस्था केली जाते . यासाठी बाबा मुजावर , शेख गयासूद्दीन , शेख अयुब , मैनू भाई व इतर मान्यवर तसेच स्वयंसेवक काझी, शिक्षक ,समाज बांधव उत्स्फुर्त पणे सहभागी होऊन शिस्तीत कार्यक्रम पार पाडण्यासाठी परिश्रम घेतात कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष सय्यद नादेरूल्हा हुसेनी यांनी सोसायटी सन २००९ पासून कार्यरत असून संस्थेमार्फत आजतागायत ६५८ विवाह संपन्न केल्याचे जाहीर केले , तसेच सोसायटीच्या वतीने समाजातील गरजू मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केल्याचे विषद केले , अत्तापर्यंत १७०मुलांनी उच्च शिक्षण पूर्ण केले असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी मार्फत केल्याचे स्पष्ट केले . चालू वर्षातही अनेक मुले उच्च शिक्षण घेत असून त्यांचा सर्व खर्च सोसायटी करणार आसल्याचे स्पष्ट केले . तसेच रमजानच्या काळात गरजूंना धान्य किट वाटण्याचे कार्यहि संस्था करते , यापुढेही समजाच्या गरजा लक्षात घेऊन पुढे कार्य करत राहू असा मानस असल्याचे सांगीतले . पुढील वर्षी ही एप्रिल महिन्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी मौलाना जाफरअली खान सहाब व मौलाना आयुब साहब यांनी कुरआनच्या तत्त्वानुसार विवाह कमी खर्चामध्ये व साध्या पध्दतीने करण्याचे आवाहन युवक व समाजबांधवांना केले , तसेच हाफिझ खारी मुजकीर खान सहाब यांनीही सर्वाना कुरआन चे संदेश दिले , नात मौलाना सलीम सहाब व यांनी सादर केली , कारी इस्माईल सहाब यांनी दुआ पठण व नवविवाहीत जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहा सर यांनी केले . ( छाया :–इस्माईल सय्यद धाराशिव )



