धाराशिव जिल्ह्यात खळबळ! कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
मानेवर धारदार शस्त्राने वार; आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात!
धाराशिव लोकविचार
धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी परिसरातील कनगरा येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र जगन्नाथ ढोबळे यांनी काल रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास किरकोळ कौटुंबिक वादाच्या रागातून आपल्या पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने पत्नीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला असून सकाळी सदरील घटना उघडकीस आली समोर आहे.
घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सदरील महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बेंबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी राजेंद्र ढोबळे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मृत महिलेला दोन मुली व एक मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच मागील दहा वर्षांपासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.या घटनेनंतर मृत महिलेच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपी पतीस आमच्या ताब्यात द्या, त्याला शिक्षा आम्ही देतो, अशी संतप्त मागणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर माहिती ही सूत्रांकडून प्राप्त प्राथमिक माहितीनुसार असून, पोलिस तपासानंतर अधिकृत माहिती समोर येणार आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


