• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

राज्यात ९ मार्चपासून नवीन ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवान्यांना स्थगिती वाहतूक कोंडी व प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 9, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

राज्यात ९ मार्चपासून नवीन ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवान्यांना स्थगिती वाहतूक कोंडी व प्रदूषणावर नियंत्रणासाठी सरकारचा निर्णय – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई | लोकमदत न्यूज

राज्यात वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि शहरी भागातील प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून ९ मार्चपासून नवीन ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. हा निर्णय परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीनंतर माहिती देताना सरनाईक यांनी सांगितले की, राज्यात सध्या अंदाजे १४ लाखांहून अधिक ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवाने दिले गेले आहेत. वाढत्या वाहनसंख्येमुळे मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी नवीन परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत नवीन ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर द्यावेत याबाबत सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्या निर्णयानुसार पुढील धोरण जाहीर करण्यात येईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सरनाईक पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील ५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो-रिक्षा व टॅक्सी परवाने देण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर भारत सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने स्थानिक परिस्थितीनुसार राज्य सरकारला निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच Motor Vehicles Act, 1988 मधील कलम ६७ (३) नुसार राज्य सरकारांना प्रवासी व माल वाहतुकीसंदर्भातील परवाने बदलण्याचा तसेच विविध योजना राबविण्याचा अधिकार आहे. या अधिकारांच्या आधारे राज्य सरकार वाहतूक कोंडी कमी करणे, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करू शकते, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
राज्यातील नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि नियोजित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी शासन लवकरच आवश्यक धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

धाराशिव शहरात पत्त्यांच्या क्लबवर पोलिसांची धडक कारवाई लाखोंच्या मुद्देमालासह ९ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

दर्गाह परिसरातील कब्रस्तानमधील झाडे तोडण्यासह स्वच्छता करावी नगरसेवक अजहर चॉंद मुजावर यांची मागणी

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post

दर्गाह परिसरातील कब्रस्तानमधील झाडे तोडण्यासह स्वच्छता करावी नगरसेवक अजहर चॉंद मुजावर यांची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!