• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 30, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आठवडी बाजारातील घाणीचा कहर नागरिकांचे आरोग्य धोक्यात, ‘रील स्टार’ स्वच्छता सभापतींवर नागरिक संतप्त!

धाराशिव – लोकमदत न्यूज

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या धाराशिव शहरातील आठवडी बाजारात सध्या घाणीचे अक्षरशः साम्राज्य पसरले असून, नाले, सांडपाणी / संडास आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळच भाजीपाला व फळांची विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताजी व आरोग्यदायी समजून घेतली जाणारी भाजी येथे ‘विषासमान’ ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
नगरपरिषदेकडून आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा व सिमेंटचे कट्टे तयार करून देण्यात आले असतानाही बहुतांश विक्रेते मुख्य रस्त्यावरच गाड्या लावून व्यवसाय करत असल्याने वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी, किरकोळ अपघात आणि वादांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आतमध्ये प्रशस्त बाजारपेठ रिकामी असताना रस्त्यावरच बाजार भरत असल्याने नियोजनाचा पूर्णपणे अभाव (फज्जा उडत) असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
अधिक गंभीर बाब म्हणजे नाल्यांच्या कडेला, सांडपाण्याच्या ठिकाणी भाजीपाला विक्री होत असून, अनेक ठिकाणी डुक्कर व इतर जनावरे त्या भाज्यांवर ताव मारताना दिसतात. त्याच भाजीपाला पुन्हा ग्राहकांना विकला जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले असून, काही व्हिडिओही समोर आले आहेत. अशा परिस्थितीत धाराशिवकरांच्या अन्नात रोज ‘घाणीचा बुस्टर डोस’ मिसळला जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, नगरपरिषद निवडणुकीवेळी स्वच्छता, सुविधा आणि नियोजनाचे मोठमोठे आश्वासन देण्यात आले होते. आठवडी बाजार विकसित करण्यासाठी सुमारे 12 कोटी रुपयांची कामे मंजूर होऊनही ती आजतागायत रखडलेली आहेत. सत्ता बदलानंतर या कामांना स्थगिती मिळाल्याने हा प्रश्न गेली चार वर्षे प्रलंबित असून, फक्त आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
विशेष म्हणजे, स्वच्छतेच्या नावावर मोठा गाजावाजा करणारे ‘रील स्टार’ स्वच्छता सभापती (नगरसेवक) यांनी 5 जानेवारी 2026 रोजी अधिकाऱ्यांसह आठवडी बाजाराची पाहणी करून सर्व समस्या तात्काळ सोडवण्याची घोषणा केली होती. मात्र तीन महिने उलटूनही परिस्थिती जैसे थेच असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहरात केवळ रील्स आणि प्रसिद्धीसाठी स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप होत असून, प्रत्यक्षात घाणीचे साम्राज्य कायम असल्याचे वास्तव समोर आले आहे.
याउलट, नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. आठवडी बाजारातील जागा तातडीने स्वच्छ करून, पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि नियोजित विक्री यासाठी ठोस उपाययोजना केल्यासच नागरिकांना दिलासा मिळू शकतो. शहराच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या प्रश्नावर प्रशासनाने पुढाकार घेऊन आदर्श निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
धाराशिवकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. स्वच्छता सभापतींनी केवळ रिल्स काढण्याएवढाच दिखावा न करता प्रत्यक्ष कामगिरीतून जबाबदारी सिद्ध करावी, तर नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आठवडी बाजाराचा चेहरामोहरा बदलावा अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.
लोकमदत न्यूज  सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

नळदुर्गमध्ये मतदार (SIR) नोंदणीचा गोंधळ बीएलओचा ठावठिकाणा नाही! नगरसेवक ‘विश्रांती’ मोडवर!

Next Post

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

Next Post

युवानेते नरसिंह मेटकरी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्षपदी निवड 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा इनामदार यांची मागणी
  • इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन ; सरकारविरोधी घोषणांनी परिसर दणाणला
  • बूथ मजबूत तर पक्ष मजबूत राष्ट्रवादी काँग्रेस श. प.पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न
  • महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”“शहरातील हायवा गायब
  • “महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच अवैध मुरूम वाहतूक ठप्प!”

Recent Comments

  1. Chief Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Chris Webber on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  3. Allen Bell on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. Cody Smith on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  5. Carl James on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.