• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून दिला धीर… आनंद (तात्या) पाटील यांची शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व मदतीची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 24, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करून दिला धीर… आनंद (तात्या) पाटील यांची शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी व मदतीची मागणी

धाराशिव दि.२४(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे करंजा गाव तसेच शिंदे व करळे वस्तीतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहेत. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.
गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला असून, करंजा परिसरातील अनेक वाड्या-वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये माती व चिखल साचल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे साहेबांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून घेतली व “सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे” असा धीर दिला.
या पाहणी दौऱ्यासोबत धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजीराव सावंत, आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर, तसेच शिवसेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद (तात्या) पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंद (तात्या) पाटील यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे केवळ पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण जगणे उद्ध्वस्त झाले असल्याचे नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, “अशा भीषण संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन तत्काळ आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या सोबत असून, सरकारकडे तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री शिंदे व नेत्यांसमोर आपले प्रश्न मांडले असता, त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले.
परांडा तालुक्यातील या पाहणी दौऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आनंद (तात्या) पाटील यांच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत अधिक जोरकसपणे पोहोचला आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv lokmadat newsdharashiv osmanabadआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शेतकरी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही
सर्व निकष बाजूला ठेवून सरसकट मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Next Post

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा – “कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही” उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा – "कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही" उपमुख्यमंत्री अजित पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!