• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
May 7, 2026
in महाराष्ट्र
0
उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत
0
SHARES
27
VIEWS

उपवर्गीकरणाविरोधात धाराशिवमध्ये रणशिंग; आ. प्रवीण स्वामी यांचा इशारा, धनंजय शिंगाडे आक्रमक भूमिकेत

धाराशिव लोकविचार

अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून ५९ प्रवर्गांमध्ये फूट पाडण्याचा राज्य सरकारचा डाव असून, हा निर्णय समाजहिताच्या विरोधात असल्याचा घणाघाती आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला. या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यात येणार असून, येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात ठाम भूमिका मांडली जाईल. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शहरातील शासकीय विश्रामगृहात अनुसूचित जातीतील ५९ प्रवर्गांच्या उपवर्गीकरणाविरोधात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार स्वामी पुढे म्हणाले की, अनुसूचित जातींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात भक्कम तरतुदी केल्या आहेत. त्या तरतुदींना कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही. सरकार हेतुपुरस्सर समाजात दुभंग निर्माण करत असून, हा डाव उधळून लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय शिंगाडे यांची ठाम भूमिका; ‘निर्णय मागे घ्या, अन्यथा राज्यभर आंदोलन’
बैठकीत संयोजक धनंजय शिंगाडे यांनी आक्रमक व स्पष्ट शब्दांत सरकारवर टीका करत उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र भूमिका मांडली.
शिंगाडे म्हणाले, उपवर्गीकरणामुळे समाजात तणाव वाढत असून, सामाजिक ऐक्य धोक्यात येत आहे. राज्यातील हजारो जातींमधील नागरिक आज अस्वस्थ आहेत. सरकार भीतीचे वातावरण निर्माण करत असून, हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही तर राज्यभर आंदोलन उभारले जाईल.
ते पुढे म्हणाले की, महार समाजासह सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे; मात्र कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. अ, ब, क, ड उपवर्गीकरणाचा घाट हा समाजात दुभंग निर्माण करणारा असून, तो आम्हाला मान्य नाही.
सरकारला थेट इशारा देत शिंगाडे यांनी सांगितले की, भीतीचे राजकारण थांबवा; अन्यथा ५९ जातींना सोबत घेऊन जिल्ह्यापासून राज्यभर व्यापक आंदोलन छेडले जाईल.
यावेळी प्रा. संजय कांबळे यांनी उपवर्गीकरणामुळे सामाजिक समतेच्या मूलभूत तत्त्वालाच धक्का बसत असल्याची भूमिका मांडली. संविधानिक आरक्षण व्यवस्थेत फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न समाजासाठी घातक ठरेल, असे ते म्हणाले.
तर राजाभाऊ ओव्हाळ यांनी ५९ प्रवर्गांनी एकसंघ राहून संघर्ष उभारण्याची गरज व्यक्त केली. समाजात कृत्रिम विभागणी निर्माण करून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत उपस्थित मान्यवरांनी एकमुखीपणे उपवर्गीकरणाला विरोध दर्शवित, ५९ जातींच्या एकत्रित शक्तीने हा लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. लवकरच आंदोलनाची दिशा निश्चित करून धाराशिव जिल्ह्यातून राज्यव्यापी आंदोलनाची ठिणगी पेटवली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या बैठकीसाठी
ॲड ज्योती बडेकर ॲड इंद्रजीत शिंदे अनिल हजारे यशपाल बनसोडे अशोक बनसोडे उपस्थित होते

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

नळदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा: शेख शहबाज अकबर यांची सोलापूर महानगरपालिकेत ‘सिव्हिल इंजिनिअर’ पदी निवड

Next Post

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

Related Posts

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा
महाराष्ट्र

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
Next Post
जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

जिल्ह्यात १०,००० कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांनी स्वीकारली सामाजिक जबाबदारी

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!