• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिवकरांना दिलासा – अखेर मंजूर झाला १४० कोटींचा निधी “दर्जेदार काम करा, नाहीतर हात सोडून सांगू” मनसेचा ठेकेदारांना इशारा…

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 26, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिवकरांना दिलासा – अखेर मंजूर झाला १४० कोटींचा निधी मनसेचा ठेकेदारांना इशारा… “दर्जेदार काम करा, नाहीतर हात सोडून सांगू”
धाराशिव (प्रतिनिधी) : धाराशिव शहरातील रस्ते व नाली कामांसाठी मंजूर झालेला तब्बल १४० कोटी रुपयांचा निधी गेल्या दीड वर्षांपासून महायुती आणि महाविकास आघाडीच्या (लोकप्रतिनिधी) राजकारणामुळे रखडलेला होता. अखेर राज्य सरकारकडून या निधीला मंजुरी मिळाली असून शहरातील नागरिकांना खड्डेमुक्त रस्त्यांचा दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धाराशिव शहराध्यक्ष निलेश जाधव यांनी ठेकेदारांना थेट इशारा दिला आहे. “जो कोणी ठेकेदार अथवा कॉन्ट्रॅक्टर धाराशिव शहरातील रस्त्यांचे काम करीत आहे, त्यांना मनसेची हात जोडून विनंती आहे की शहरातील मुख्य रस्ते व नालीचे काम अत्यंत दर्जेदार व्हावे. जर काम हलगर्जीपणे व निकृष्ट दर्जाचे झाले, तर आम्हालाही हात सोडून ही सांगता येते,” असा इशारा जाधव यांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख ५९ रस्त्यांसाठी दीड वर्षांपूर्वी निधी मंजूर झाला होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे व राजकीय वादांमुळे या कामांना विलंब झाला. या काळात धाराशिवकरांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना अक्षरशः हाल सोसावे लागले.
“जनतेला दीड वर्ष खड्ड्यांमधून फिरवल्यानंतर आता निवडणुकीच्या तोंडावर कार्यारंभ आदेश काढले जात आहेत. श्रेयवादात अडकून राहण्याऐवजी शहराचे रस्ते दर्जेदार कसे होतील यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे मत जाधव यांनी व्यक्त केले.
निवडणुकीचा काळ डोळ्यांसमोर ठेवून हा निधी मंजूर झाल्याचा आरोप करत त्यांनी पुढे म्हटलं की, “धाराशिवची जनता सर्व पाहत आहे. जर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले, तर नागरिक या हलगर्जीपणाचा वचपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काढल्याशिवाय राहणार नाही.”

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsosmanabad newsआंदोलनउस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमनसेराजकीय मोर्चा
Previous Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Next Post

धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकी ची भाजपची तयारी पूर्ण- दत्ताभाऊ कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.