लोकविचारच्या १० हजार फॉलोअर्सचा टप्पा; विश्वासाची जबाबदारी आता आणखी वाढली
‘सत्य शोधून लिहिण्याची ताकद’ हे ब्रीद घेऊन वाटचाल करणाऱ्या लोकविचार या वृत्तपत्र व फेसबुक पेजने अल्पावधीतच १० हजार फॉलोअर्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, कायदा सुव्यवस्था आणि जनहिताच्या प्रश्नांना निर्भीडपणे वाचा फोडण्याच्या भूमिकेला मिळालेला हा प्रतिसाद निश्चितच उत्साहवर्धक आहे.
लोकविचारच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न, अन्याय-अनियमितता आणि प्रशासनासमोरील वास्तव परिस्थिती सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता सत्य जनतेसमोर मांडण्याची भूमिका यापुढेही कायम राहणार आहे.
या प्रवासात लोकविचारवर विश्वास ठेवून पेजला फॉलो करणाऱ्या प्रत्येक वाचकाचे मनःपूर्वक आभार. १० हजार हा केवळ आकडा नसून लोकांनी दाखवलेल्या विश्वासाची पावती आहे आणि त्यासोबत जबाबदारीही तितकीच मोठी आहे.
ज्यांनी अद्याप लोकविचार फेसबुक पेजला फॉलो केलेले नाही, त्यांनी आजच फॉलो करून या निर्भीड पत्रकारितेच्या प्रवासाचा भाग व्हावे.
“सत्य शोधून लिहिण्याची ताकद” हीच लोकविचारची ओळख आणि यापुढील वाटचालीची दिशा राहणार आहे.
— संपादक अमजद सय्यद 8390088796












