• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याचा निषेध; संजय इंचे यांच्यावर कठोर कारवाईची राजाभाऊ राऊत यांची मागणी

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 25, 2026
in राजकारण
0
महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याचा निषेध; संजय इंचे यांच्यावर कठोर कारवाईची राजाभाऊ राऊत यांची मागणी
0
SHARES
41
VIEWS

“महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याचा निषेध; संजय इंचे यांच्यावर कठोर कारवाईची राजाभाऊ राऊत यांची मागणी

धाराशिव लोकविचार


महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारधारेचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान करणाऱ्या वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी तीव्र निषेध केला आहे.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच धाराशिव जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून जालना येथील संजय इंचे यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या सभेत केलेल्या “महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा नाही” या वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राची ओळख ही संत परंपरा, सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांनी निर्माण झाली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचा लढा दिला, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी सामाजिक न्यायाची दारे खुली केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समानता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेचा संदेश दिला.
अशा महापुरुषांच्या विचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे वक्तव्य हे महाराष्ट्राच्या सामाजिक अस्मितेला धक्का देणारे असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे राजाभाऊ राऊत यांनी म्हटले आहे.
“महापुरुष हे कोणत्याही एका समाजाचे किंवा पक्षाचे नसून संपूर्ण महाराष्ट्राची वैचारिक संपत्ती आहेत. त्यांच्या विचारांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्तींवर शासनाने कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
तसेच संबंधित वक्तव्याचा व्हिडिओ तपासून तातडीने गुन्हा दाखल करावा, भविष्यात अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास लोकशाही व सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) चे धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत यांनी दिला आहे

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराजकारण
Previous Post

फुटीर खासदारांना कोट्यवधींचे लाभ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप

Next Post

यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

यात्रा मैदानाच्या प्रश्नावर महिलांचा एल्गार मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीची ओटी भरून अनोखे आंदोलन

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!