• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य


खरीप २०२० पीक विम्याचे पैसे वाटपासाठी ‘विशेष खाते’ उघडण्यास मंजुरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 25, 2026
in कृषी
0
0
SHARES
1
VIEWS


खरीप २०२० पीक विम्याचे पैसे वाटपासाठी ‘विशेष खाते’ उघडण्यास मंजुरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना २०२० साल खरीप हंगामातील पीक विमा परताव्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने मंगळवार २४ मार्च रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यासाठी ‘वैयक्तिक ठेव खाते’ उघडण्यास विशेष बाब म्हणून आपल्या महायुती सरकारने आता मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हा मोठा दिलासादायक निर्णय असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.


खरीप २०२० च्या पीक विम्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, शेतकऱ्यांना विम्याची रक्कम अदा करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावाने स्वतंत्र खाते उघडण्याची आवश्यकता होती. 
१३४ कोटींहून अधिकचा निधी आपल्या महायुती सरकारने उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यासाठी शासनाने निधीची व्यवस्था केली आहे. त्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा प्रलंबित राज्य हिस्सा म्हणून १३४ कोटी ११ लाख ९१ हजार ९३८ रुपये वितरित करण्यात आले आहेत. न्यायालयाकडून मिळालेली व्याजासह रक्कम देखील याच खात्यात जमा केली जाणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे. 

हे विशेष खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडले जाणार असून, त्याबाबत शासनाने कडक अटी घातल्या आहेत. हे खाते पुढील तीन वर्षांसाठी म्हणजे सन २०२५-२६ ते २०२७-२८ वैध असणार आहे. या खात्यातून होणारा खर्च केवळ खरीप २०२० वर्षामधील पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीच केला जाणार आहे. या खात्याचे नियमित ऑडिट केले जाईल आणि दरमहा जिल्हा कोषागार कार्यालयाशी मेळ घातला जाईल. तसेच या खात्याचे वर्गीकरण ‘नागरी ठेव’ या अंतर्गत करण्यात आले आहे. 

न्याय मिळेपर्यंत अखंड प्रयत्न करणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

शासनाच्या या निर्णयामुळे आता धाराशिवच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तातडीने हे खाते कार्यान्वित करेल. नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून त्याबाबतचे प्राधिकारपत्र प्राप्त होताच, शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचा दुसरा हप्ता आणि इतर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. १६ मार्च व २३ मार्च रोजी या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आपले वकील ॲड. सुधांशु चौधरी तसेच राज्य व केंद्र सरकारचे वकील उपस्थित होते. या विषयावर आपले व्यक्तिशः संपूर्ण लक्ष असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपले प्रयत्न अखंडपणे सुरूच राहतील असे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेला गती धाराशिव जिल्ह्यातील प्रस्तावांना लवकरच प्रशासकीय मान्यता

Next Post

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा फोल १५ दिवसांनी घरपोच सेवा, रांगा कायम, बीएसएनएलवर मेसेज बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!