• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 10, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS

जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आंदोलन

तर सरकार कोणालाही जेलमध्ये टाकण्याचा धोका

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) – महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ तात्काळ रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करीत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. तसेच मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यपालांना दि.१० सप्टेंबर रोजी देण्यात आले. दरम्यान जब जब मोदी डरता है… पुलिस को आगे करता है ! तानाशाही नही चलेगी…. मत चोरी… खुर्ची चोरी….. जनसुरक्षा कायदा…रद्द झालेच पाहिजे… हुकूमशाही सरकारचे करायचे काय…खाली मुंडके वर पाय… अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील प्रवेशद्वारावरच रोखून धरीत पोलिसांनी दडपशाही करीत हुज्जत घातली.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हे घटनाविरोधी व लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे. विशेष म्हणजे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची मस्करदाबी व्हावी व हुकूमशाही यंत्रणा बळकट व्हावी हाच कुटील हेतू या विधेयकाच्या माध्यमातून साधला जाणार आहे. तसेच शासनाच्या विरोधात बोलणाऱ्या सामान्य नागरिकांना व पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून दडपशाही व बळाचा वापर करून त्यांच्याविरुद्ध खोट्या कारवाया करण्यात येतील, अशी विविध संघटना आणि विरोधी पक्षांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व सामाजिक चळवळीतील काम करणारे कार्यकर्ते यांच्यामध्ये या विधेयकामुळे प्रचंड असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच सरकारच्या असंविधानिक व चुकीच्या ध्येय धोरणावर जो जो विरोधी पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक टीका करतील, सरकारच्या विरोधात बोलतील आणि न्यायासाठी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. त्या सर्वांना विना चौकशी जेलमध्ये टाकण्याचा अधिकार या जनसुरक्षा कायद्याने सरकारला मिळाला आहे. तर संविधानिक मार्गाने काम करणारे विरोधी पक्ष, संघटना, शिव-फुले-शाहू-आंबेडकरवादी संघटना, पुरोगामी, शेतकरी व कामगार संघटना या संपवण्यासाठी सरकार या कायद्याचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले पत्रकार आणि लेखक यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य घाला घालणार आहे.  त्यामुळे राज्यपालांनी या कायद्याविरोधात जनक्षोभ लक्षात घेऊन तो जनसुरक्षा कायदा सरकारने मागे घ्यावा यासाठी शिफारस व आदेश करावेत, अशी मागणी केली आहे.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड धीरज पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, शिवसेना (ठाकरे) चे मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, डॉ स्मिता शहापूरकर, खलील सय्यद, रवी वाघमारे, पंकज पाटील, पिंटू कोकाटे, विजय सस्ते, विलास शाळू, प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, उमेशराजे निंबाळकर, ॲड जावेद काझी,जगन्नाथ शिंदे, बंडू आगरकर, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, शिवाजी घोलप, विठ्ठल माने, कपिल सय्यद, नरदेव कदम, सुदन पाटील, बापू साळुंखे,  भास्कर शिंदे, बाळासाहेब कणसे, औदुंबर घोंगडे, बालाजी डोंगे, नामदेव चव्हाण, बाळासाहेब कथले, राहुल धाबेकर, अक्षय धाबेकर, आयुब पठाण, बोधला गायकवाड, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, किसन भिसे, गौतम क्षीरसागर, दिलीपराव, बाबुराव तवले, अर्जुन बिराजदार, कानिफनाथ देवकुळे, अमित रेड्डी, प्रकाश चव्हाण, अविनाश माळी, संजय गजधने, शीलाताई उंबरे- पेंढारकर, सरफराज काझी, हरिदास शिंदे, विजय गायकवाड, बाबा मस्के, अभिमान पेठे, अमोल नळेगावकर, प्रभाकर डोंबाळे, बी डी राऊत, शिवाजी घोलप, बाबा पाटील, गोरोबा झेंडे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: #धाराशिव #उस्मानाबाद आंदोलनdharashivosmanabadकाँग्रेसतुळजापूर शिवसेनामहा विकास आघाडीराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
Previous Post

पत्रकार असल्याचे सांगून खंडणीसाठी धमकी देत मागितली पाच हजारांची रक्कम

Next Post

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने शनिवारपासून दोन दिवसीय धाराशिव फेस्टिव्हल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!