• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 17, 2026
in महाराष्ट्र
0
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत
0
SHARES
11
VIEWS

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी प्रत्येकाने अर्ज करावेत – पाटील
मंगळागौरनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव लोकविचार

प्रधानमंत्री आवास, रमाई आवास, शबरी आवास आदींसह इतर योजनेंतर्गत आजपर्यंत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आवास योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. नुकतीच प्रधानमंत्री आवास योजनेची यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. या यादीत ज्यांची नावे आलेली नाहीत अशा सर्व लाभार्थ्यांनी हक्काच्या घरकुल योजनेपासून कोणीही वंचित राहू नये. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.३१ ऑगस्टपर्यंत आपली नावे ग्रामपंचायत तसेच आवास प्लस या पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी दि.१६ ऑगस्ट रोजी केले. मंगळागौरी आगमनानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीचे खेळ दि.१ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कक्षात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, दत्तात्रय देऊळकर, जिल्हा ग्रामीण विकास प्रकल्पचे मेघराज पवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना पाटील म्हणाल्या की, २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील १ लाख ८ हजार २३२ लाभार्थ्यांचा सर्वे करण्यात आला होता. त्यापैकी ८९ हजार ८९४३ लाभार्थी पात्र तर १९१८९ लाभार्थी अपात्र ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या याद्यांचे १५ ऑगस्टपासून ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात येत आहे. त्यामध्ये काही लाभार्थी अपात्र ठरले तर त्यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील ज्या नागरिकांचे ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमित करण्यात येणार आहे. तसेच ज्यांना जागा नाही त्यांना जागा खरेदीसाठी पंडित दीनदयाळ जागा खरेदी योजने अंतर्गत १ हजार स्क्वेअर फुट जागा खरेदीसाठी अनुदान दिले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत सोलर व शौचालय असे एकूण २ लाख रुपये रक्कम लाभार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. टप्पा – १ २०१६-२२ या कालावधीत विविध योजनेची १२८०४ घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर २०२२ ते २०२६ या कालावधीत ६७७६० घरकुले मंजूर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मंगळागौरीच्या आगमनानिमित्त लेडीज क्लबच्यावतीने महिलासाठी मुंबई येथून मंगळागौरीचे खेळ करणारा एक ग्रुप खेळ सादर करण्यासाठी येणार आहे. विशेष म्हणजे सर्व सख्यांसाठी श्रावण आणि गौरी सणाबरोबरच माहेरचा आनंद लुटण्यासाठी झोके, मेहंदी, बांगड्या, वाण, मंगळागौरी, झिम्मा, फुगडी, घागर फुंकणे तसेच सासु-सुनेची गाणी, देवीची गाणी आणि नृत्य अशा भरगच्च मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन मंगळवार दि.१ सप्टेंबर रोजी लेडीज क्लब येथे सायंकाळी ५ वाजता आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्पर्धा देखील असून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकास ५० हजार रुपये, द्वितीय ३५ हजार रुपये, तृतीय २५ हजार रुपये व प्रोत्साहनपर ११ हजार रुपयांची ३ आणि ५००१ रुपयांची २ बक्षीस ठेवण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच सासु-सुनेच्या नात्याची नवी सुंदर गोष्ट अग आई, अहो आई हा मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर डॉ. साक्षी मल्हार पाटील यांच्या पहिल्या मंगळागौरीचा आनंद माहेरच्या मायेने आणि आपुलकीने साजरा करूया असे आवाहन पाटील यांनी केले.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादघरकुलजिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटीलधाराशिवधाराशिव ग्रामीणधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

Next Post

“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

“अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी मातंग समाजाचा निर्णायक एल्गार!”

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!