पावसाळ्यापूर्वी प्रभाग क्र. ९ मधील नाले-गटारी तातडीने साफ करा; राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष खालेद इनामदार यांची पालिकेकडे मागणी
नळदुर्ग : प्रतिनिधी अझहर शेख
पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने, शहरातील प्रभाग क्रमांक ९ रहिमनगर भागात मधील छोटे-मोठे नाले आणि गटारींची तातडीने साफसफाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते खालेद इनामदार यांनी पालिकेकडे केली आहे.
या संदर्भात त्यांनी प्रशासनाला निवेदन देत जनहितार्थ तातडीने पावले उचलण्याची विनंती केली आहे.प्रभाग क्रमांक ९ रहिमनगर भागात मधील अनेक भागांत सध्या गटारी आणि नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक आणि गाळ साचला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर ही घाण उपसली नाही, तर पहिल्याच पावसात नाल्यांचे पाणी तुंबून रस्त्यावर आणि थेट नागरिकांच्या घरात शिरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊन डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती खालेद इनामदार यांनी व्यक्त केली आहे.प्रभाग क्रमांक ९ मधील ज्या सखल भागात पाणी साचते, तिथले नाले युद्धपातळीवर मोकळे करण्यात यावेत. जंतुनाशक फवारणी साफसफाईसोबतच डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने जंतुनाशक पावडर आणि औषध फवारणी करण्यात यावी पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करून तात्काळ कामाला सुरुवात करावी.खालेद इनामदार यांच इशारा प्रभागातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने आत्ताच मान्सूनपूर्व कामे हाती घ्यावीत. जर वेळेत नालेसफाई झाली नाही आणि नागरिकांना त्रास झाला, तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडावे लागेल,” असा स्पष्ट इशारा खालेद इनामदार यांनी दिला आहे.या मागणीमुळे आता पालिकेचा स्वच्छता विभाग प्रभागात कधीपासून काम सुरू करतो, याकडे प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांचे लक्ष लागले आहे. नागरिकांनीही या मागणीचे जोरदार स्वागत केले आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

