नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी
धाराशिव – लोकविचार
धाराशिव नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करावे, अशी मागणी बालवाडी शिक्षकांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दि.२१ एप्रिल रोजी केली आहे. दरम्यान, मागणी मान्य न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.धाराशिव नगर परिषदेतील बालवाडी शिक्षकांना कायम सेवेत समावेशन करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. त्या मागणीसाठी अनेकांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. जा.क्र./नपाप्र/कार्यासन-२/सिआर-२२३ दि.२६/०७/२०१० अन्वे दि.१० मार्च १९९३ पूर्वीच्या नंतरच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणे बाबतचे पत्र धाराशिव जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांना देण्यात आले होते. त्या अनुषंगाने धाराशिव नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या प्रशासन, अधिकारी शिक्षण विभागाने त्यांचे पत्र जाक्र ३२८/१० दि.३ ऑगस्ट २०१० अन्वये नपचा शिक्षण विभागामध्ये रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या बालवाडी सेविका व बालवाडी शिक्षिका यांची यादी मुख्याधिकारी यांच्याकडे सादर केली होती. मात्र यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. नगर परिषदेचे कार्यालयीन पत्र जाक्र नप/आस्था/५३३१/२०२२ दि.१ नोव्हेंबर २०२२ अन्वये मुंबई वरळी येथील नगर परिषद प्रशासन संचालनाच्या संचालकास समावेशन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. धाराशिव नगर परिषदेतील आस्थापना विभागांमध्ये त्यांच्या समावेशन बाबत चौकशी करण्यास बालवाडी शिक्षिका गेल्यास त्यांना उडवा-उडवीची उत्तरे, दिशाभूल करणारी माहिती देऊन जाणीवपूर्वक दिशाभूल केली जाते. मात्र सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा पैकी जे काही बालवाडी शिक्षिकेचे कायमसेवेत समावेश करण्यात आलेले नाही. बालवाडी शिक्षिका हे पदनाम गट कसरणीमध्ये मंजूर असताना देखील ठाई स्वरूपामध्ये मंजुरी नसलेल्या बाबत कळविले आहे. जर मंजूर आकृतीबंध मध्ये बालवाडी सेविका हे पदनाम अस्थाई पद म्हणून मंजूर असल्याने त्या पदावर २८ बालिका सेविकांचे समावेशन करण्यात आले व बालवाडी शिक्षकाही पदनाम अस्थायी व पद म्हणून मंजूर असताना देखील या पदावर समावेशन करण्याचा आटा केली जात आहे. त्यामुळे वरील मागणी मान्य नाही झाल्यास 28 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजंदारी तत्त्वावर कार्यरत असलेले बालवाडी शिक्षिकासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. यावर बालवाडी शिक्षिका लता धनवडे, पंचशीला चंदनशिवे, रजनी कसबे, माधुरी यादव, आशा फिसके, कल्पना डांगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

