धाराशिव येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमविषयक बैठक
धाराशिव, दि.२० (प्रतिनिधी) राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी १८ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी दिनांक १९ ऑगस्ट रोजी तहसिल कार्यालय,धाराशिव येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत बैठक पार पडली.या बैठकीदरम्यान धाराशिव तालुक्यातील तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकेचे वाटप श्री. ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय योजनांची अंमलबजावणी, तक्रार निवारण यंत्रणा तसेच जनतेपर्यंत अन्नधान्याचे सुयोग्य वितरण यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.अपात्र व मयत लाभार्थ्यांची नावे वगळून पात्र लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करून देणे,तृतीयपंथी व भिक्षेकरी यांनाही अन्नधान्याचा लाभ मिळावा,तसेच एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये,अशा स्पष्ट सूचना श्री.ढवळे यांनी दिल्या.
याच बैठकीदरम्यान धाराशिव तालुक्यातील तृतीयपंथी व दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साकळे, तहसिलदार डॉ.मृणाल जाधव व पुरवठा निरीक्षण अधिकारी अमोल बाहेकर उपस्थित होते.
यावेळी ढवळे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी : वसंत गणपती गंगने, चंचलाबाई ज्ञानदेव दणाणे,सिता मोहन डावकरे,अनुसया महादेव लोंढे,पल्लवी रणजित मगर,रुक्मिणी नितीन कांबळे.तृतीयपंथी लाभार्थी : तेजसिंग भूजंग पेठे,श्रावण शिवाजी वैरागे,अभिजीत रमेश निंबाळकर, नितीन अरुण बनसोडे,नेताजी विठ्ठल बडबडे,मुन्ना अजीज शेख,मोगरा युन्नुस सय्यद,आकाश प्रकाश काकडे, सागर सुरेश सरोदे या लाभार्थ्यांना अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
