• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जमीन खरवडली, विहिरीत गाळ, ड्रीपसेटही वाहून गेले पंचनामे सुरु : आ. राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 16, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव (प्रतिनिधी):जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. वाशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला आहे. अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे विहिरी गाळाने भरल्या आहेत तर काही ठिकाणी शेतातील ड्रिपसेटही वाहून गेले आहेत. प्रशासनाला या सगळ्या बाबींचे तातडीने पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या असून पंचनामे सुरु देखील करण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनीही आपापल्या परिसरात झालेल्या नुकसानीची तक्रार संबंधित तलाठ्यांकडे तातडीने दाखल करावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

कळंब तालुक्यातील खोंदला गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या आपल्या एका सहकाऱ्याच्या अद्यापही शोध सुरूच आहे. दुर्दैवाने या शोधकार्यात अद्यापपर्यंत आपल्याला यश आलेले नाही. तेरणा धरण शंभर टक्के भरले आहे. मांजरा धरणातही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. मांजरा धरणात देखील मोठ्या वेगाने पाणी दाखल होत असल्याने लवकरच मांजरा धरणही शंभर टक्के भरेल अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाला आहे. कळंब आणि परिसरातील पावसाची आकडेवारी अभूतपूर्व आहे. इटकूर परिसरात मागील चाळीस वर्षांत असा पाऊस झाला नसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. इटकूर गावातील पुलावर जवळपास ५ तास दोन ते तीन फूट पाणी होते. त्यामुळे परिसरातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीन पूर्णतः खरवडून गेली असल्याचे दिसत आहे. नदीकाठी असलेल्या शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सर्व तहसीलदार आणि तलाठ्यांसोबत तातडीने संपर्क साधून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात देखील झाली आहे. शेतकरी बांधवांनीही तलाठ्यांकडे तातडीने नुकसानीच्या तक्रारी सादर कराव्यात कराव्यात, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

अनेक भागात जनावरे दगावली असल्याची माहिती उपलब्ध होत आहे. शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती आणि जनावरे दगावली असल्यास याबाबतही तातडीने तक्रारी सादर कराव्यात. पुढील दोन- तीन दिवस आणखी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. बहुतांश बंधारे पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहेत. अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यामुळे पुढील पाऊस जास्त नुकसानकारक ठरण्याची भीती आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिल्या आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणा नंतर कुठल्याही प्रशासकीय बैठकीला हजेरी न लावता तातडीने बांधावर जाऊन उद्भवलेल्या पूर परिस्थितीची व नुकसानीची पाहणी केली. सगळी माहिती जाणून घेतली. प्रशासनाला युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Tags: अतिवृष्टीअनुदान मदतकार्य dharashiw osmanabad कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आ. राणाजगजितसिंह पाटीलकळंबकृषी विभागखोंदला
Previous Post

महाराष्ट्र ओपन स्क्वॉश टुर्नामेंटमध्ये धाराशिवचा सत्यजीतराजे कात्रे महाराष्ट्रात ४ था

Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद…तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधला थेट संवाद...तातडीने पंचनामे व मदतकार्याचा आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

अवैध गुटखा विक्रीला आनंदनगर पोलिसांचा दणका;

August 30, 2026
कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!