• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

करजखेडा दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी २४ तासांत गजाआड – स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 14, 2025
in क्राईम
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव दि.१४(प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्यातील करजखेडा येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटविला आहे.
ही यशस्वी कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफाकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे बांबळीच्या सहकार्याने पार पडली.

करजखेडा येथे काल घडलेल्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस ठाणे बांबळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयितांवर गुप्त पाळत ठेवून होते. गुन्हा 209/2025 कलम 103, 3(5) बीएनएस अन्वये नोंदविण्यात आला होता. सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी १) जीवन हरिबा चव्हाण आणि २) हरिबा यशवंत चव्हाण हे पुण्यात नातेवाईकांकडे पळून गेले असल्याचे समजताच तत्काळ पुणे गाठून लपून बसलेल्या संशयितांना शोधून काढले.
त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ पुण्यात दाखल झाले. पथकाने आरोपींच्या नातेवाईकांच्या घरावर दक्ष नजर ठेवून,संशयित असल्याचे अधिकृत माहिती मिळताच योग्य क्षण साधून आरोपींना जेरबंद केले. दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन धाराशिव येथे आणण्यात आले असून त्यांची वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींना पोलीस ठाणे बांबळी येथे हजर करण्यात आले.

या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, स.पो.नि. सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गाडेकर, पोना. बाबन जाधवर, अशोक ढगारे, विजय धुळे, महेबुब अरब आदींचा विशेष सहभाग होता.

स्थानिक गुन्हे शाखेने दाखविलेल्या तत्परतेमुळे गुन्ह्याचा तपास अवघ्या चोवीस तासांत लावून दोघांना बेड्या ठोकून वेगाने छडा लागला असून, यामुळे नागरिकांमध्ये कायद्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ही कारवाई संपूर्ण पोलीस यंत्रणेच्या कौशल्य, समन्वय आणि धैर्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Tags: crimedharashiwosmanabadpoliceठाणेधाराशिव
Previous Post

जिल्हा नियोजन समितीच्या स्थगितीमुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आरोग्याचाच श्वास अडकला !

Next Post

धाराशिव नगर परिषद प्रशासनातील अंधार दूर करण्याचे अंधारे यांच्यासमोर आव्हान !

Next Post

धाराशिव नगर परिषद प्रशासनातील अंधार दूर करण्याचे अंधारे यांच्यासमोर आव्हान !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.