• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सत्ताधाऱ्यांचा गर्व जनतेसमोर चालत नाही शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घ्यावाच लागेल – आ. कैलास पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 28, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी):”सत्ताधारी कितीही गर्विष्ठ असले तरी जनमताच्या रेट्यापुढे त्यांना झुकावेच लागेल,” अशा शब्दांत आमदार कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपली भूमिका मांडली. धाराशिव तालुक्यातील पिंपरी येथे त्यांनी नागरिकांची भेट घेऊन अडचणी व मागण्या जाणून घेतल्या.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घाम गाळून उभे केलेले पिक पाण्यात वाहून गेले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. “आयुष्याचं सोने आज चिखलाखाली गाडलं गेलं आहे,” अशा शब्दांत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या वेदना व्यक्त केल्या.

राज्य सरकार फक्त पंचनाम्याच्या घोषणांवर समाधानी असल्याचा आरोप त्यांनी केला. “फक्त पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे,” अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

गावकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी आश्वासन दिले की, “मी स्वतः शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणार आहे. ही मागणी मान्य व्हावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे.”

या भेटीदरम्यान शेतकरी व गावकरी यांनी आपल्या अडचणी व मागण्या आमदारांसमोर मांडल्या. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या वेदना ऐकून आमदारांनी त्यांना धीर देत त्वरित मदतीसाठी आवाज उठवला.

शेतकऱ्यांचे दु:ख आणि नुकसान लक्षात घेता सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा जनमताचा रेटा त्यांना झुकवेल, असा इशारा आमदार कैलास पाटील यांनी शासनाला दिला.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashivdharashiv collectordharashiv lokmadat newsosmanabadअतिवृष्टीअनुदानआपत्तीग्रस्त शेतकरीआमदारआमदार कैलास पाटीलओमराजे निंबाळकरकर्जमाफीखासदारधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकमदतकार्य
Previous Post

वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यावर महिला शिपायाचे गंभीर आरोप – गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

श्रीसिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात, सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर

Next Post

श्रीसिद्धिविनायक मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभा उत्साहात, सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • महाकाली कला केंद्रावर अखेर गंडांतर परवाना रद्द करून 24 तासांत सील, प्रशासनाची मोठी कारवाई
  • ह.भ.प. कल्याणराव चव्हाण यांचे धाराशिव
  • “हायकोर्टाचा कडक दणका! महाकाली कला केंद्रावर सीलची तलवार — नियमभंग उघड, कारवाई अटळ”
  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

Recent Comments

  1. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. Rosabel Edney on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.