• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 24, 2026
in महाराष्ट्र
0
समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यकमहेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत
0
SHARES
51
VIEWS

समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे आवश्यक
महेश नवमी कार्यक्रमात अ‍ॅड. दिपा बियाणी यांचे मत
शोभायात्रेसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन


धाराशिव लोकविचार


समाजाने विवेकशील सामाजिक बदल स्विकारणे अपरिहार्य आहे. परंतु ते बदल स्विकारताना सामाजिक विवेक जागृत ठेवणे आवशयक आहे, असे मत प्रदेश माहेश्वरी महिला संघटनमंत्री अ‍ॅड. दिपा बियाणी यांनी व्यक्त केले.
महेश नवमीनिमित्त शहरातील बालाजी मंदिरात मंगळवार, 23 जून रोजी प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माहेश्वरी समाजाच्यावतीने उत्पत्ती दिवस म्हणजेच महेश नवमी साजरी करण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला संघटनेच्या सचिव अनिता मालू, प्रदेश सभेचे माजी अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी, जिल्हा सभेचे अध्यक्ष जुगलकिशोर लोया, सचिव श्याम भन्साळी, महिला संघटनेच्या अनुराधा सारडा, सचिव प्रिया मंत्री, जिल्हा युवा संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण मुंदडा, सचिव गोकुळ बांगड, तालुका सभेचे अध्यक्ष चेतन भन्साळी, योगेश सारडा, अमरनाथ सारडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना बियाणी म्हणाल्या की, माहेश्वरी समाजाकडे इतर समाज अत्यंत आदराने पाहतो. समाजाची वेगळी ओळख आहे, ती आपण जपायला हवी. सध्या जग नाविन्यतेकडे ओढले जात आहे. परंतु नाविन्यता स्विकारताना विवेकशील रहायला हवे. सध्याच्या युगात संपत्ती एवढेच संस्कारालाही अत्यंत महत्व आहे. अयोग्याचे पतन आणि योग्यतेचे जतन करताना समाजातील नकारात्क विषयावर चर्चा करण्यापेक्षा सकारात्मक कृती आणि विचार करणो आवश्यक आहे.
यावेळी प्रदेश महिला सभेच्या सचिव अनिता मालू म्हणाल्या की, सध्याच्या काळात संयम हा फार महत्वाचा आहे. खास करून तरूण पिढीने संयमाचा अंगीकार करायलाच हवा. समाज निर्माणाच्या कार्यात केवळ चर्चा न करता त्यावर अंमल करणो गरजेचे आहे. आपल्या समाजाची मुख्य ओळख व्यापार, इमानदारी, संस्कारीत जीवन ही आहे. ती आपण संयुक्त परिवाराच्या माध्यमातून पुढे आणायला हवी.
यावेळी प्रदेश सभेचे माजी अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी व पुनम तापडिया यांचेही प्रेरक मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक जुगलकिशोर लोया व अनुराधा सारडा यांनी केले. सात दिवस चालणार्‍या या महेश नवमी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळांच्या स्पर्धा, समाजातील विविध स्तरातील गुणवंतांचा सत्कार, सहभोजन या व अन्य स्पर्धांचे आयोजन केले जाते.
दरम्यान सकाळी शहरातून शिस्तबध्द शोभायात्रेचे आयोजन करून भगवान शंकराची रथात मिरवणूक काढली जाते. दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली जाते. यावेळी उदयोन्मुख युवती कलाकार राजेश्वरी सारडा, राशी मिनियार, निशा खंडेलवाल यांनी आपल्या मनमोहक नृत्यातून महेश वंदना प्रस्तुत केली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा मोदाणी, चेतन नोगजा यांनी तर आभार श्याम भन्साळी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जगदीश मोदाणी, मुरलीधर चांडक, हरिश सारडा, सचिन बांगड, सागर चांडक, विनय सारडा यांनी परिश्रम घेतले.

Tags: dharashivdharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव लोकविचार
Previous Post

तोतया पोलिसाला अभय कुणाचे? व्हिडिओ पुरावे, अप्पर पोलीस अधीक्षकांचे आश्वासन तरीही आरोपी मोकाटच!

Next Post

तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तिरट मटका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; ३.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, माजी नगराध्यक्षासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!