• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 19, 2026
in महाराष्ट्र
0
धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम
0
SHARES
62
VIEWS

धाराशिवमध्ये ‘सह्याद्री देवराई’चा महत्त्वाकांक्षी उपक्रम; पाच देवरायांची निर्मिती होणार, CSR निधीतून कोट्यवधींची गुंतवणूक

मुंबई/धाराशिव | लोकविचार

धाराशिव जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात पाच नवीन देवरायांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्येकी पाच एकर जागेवर विकसित होणाऱ्या या देवरायांसाठी नामांकित उद्योग समूहांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून आर्थिक सहभाग घेतला जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

या संदर्भात मुंबई येथे आयोजित बैठकीत उपक्रमाच्या विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांचे केवळ रोपणच नव्हे तर पुढील पाच वर्षे नियमित संगोपन आणि संवर्धन केले जाणार आहे. पर्यावरणीय समतोल राखणे, जैवविविधता वाढविणे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

सरनाईक यांनी पुढे सांगितले की, एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून पाच वर्षांच्या कालावधीत हा खर्च अंदाजे अडीच कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. अशा प्रकारे पाच देवरायांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याबाबत जिल्हाधिकारी आणि वन विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.

‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत पर्यावरण संवर्धनाचे यशस्वी प्रयोग राबविण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील हा उपक्रम देखील पर्यावरणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. औद्योगिक क्षेत्र आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातून उभारल्या जाणाऱ्या या देवराया भविष्यात जिल्ह्याच्या हरित विकासाला नवी दिशा देणार आहेत.

जिल्ह्यात वाढते तापमान, घटणारी वृक्षसंख्या आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पर्यावरण संवर्धनासाठी शासन, उद्योग समूह आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabaddharashiv osmanabad पालकमंत्री प्रताप सरनाईकLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

कळंबमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग! छेडछाड अन् घरात घुसून मारहाण!

Next Post

आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post
आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

आरक्षण उप वर्गीकरण जन आक्रोश मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!