• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्री सरनाईकांचे स्पष्ट निर्देश

शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची पूर्ण नोंदणी अनिवार्य

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 16, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS

धाराशिव, दि.१६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक भूमिका घेतली.”शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही पुढील व्यवहार करण्यात येऊ नये,” असे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आजच्या या बैठकीला खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, गेल्या काही काळात पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीचे व्यवहार करताना शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे, करारपत्रांमध्ये त्रुटी ठेवणे किंवा अटी अस्पष्ट ठेवणे अशा अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या.यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून,त्यांना आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की,”शेतकरी हा या व्यवहारातील मुख्य घटक आहे.त्याला फसवले जाऊ नये याची हमी प्रशासनाने घ्यावी.पवनचक्की कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय राखणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे.”

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली यासाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.ही समिती शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी,नोंदणी प्रक्रिया तसेच पवनचक्की कंपन्याकडून होणाऱ्या पुढील व्यवहारांचे नियमन करेल.कोणताही करार पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सर्व हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत,अशी अट घालण्यात आली आहे.

पालकमंत्री सरनाईक यांनी पुढे सांगितले की,जिल्ह्यातील विकासकामांसाठी गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे,मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क गमावले जाऊ नयेत.पवनचक्की प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती आणि वीज उत्पादनाला चालना मिळणार असली,तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे.



बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली.काहींनी सांगितले की,त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही,तर काहींनी करारातील अटींचे स्पष्टीकरण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.या सर्व तक्रारी गांभीर्याने घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.



शेतकऱ्यांमध्ये यामुळे दिलासा निर्माण झाला आहे.पवनचक्की कंपनीसाठीही स्पष्ट नियम आखल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पुढील काळात वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या समितीमुळे दोन्ही बाजूंचा विश्वास वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



पवनचक्की प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या हितसुरक्षेसाठी सरकारने कडक भूमिका घेतली आहे.कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यवहार होणार नाही, हा पालकमंत्री सरनाईक यांचा संदेश शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

Tags: crimedharashiwosmanabadpolicesolartuljapurआढावा बैठकआंदोलनआमदारआमरण उपोषणउस्मानाबादओमराजेकैलास पाटीलखासदारग्रामसभाजिल्हाधिकारी कार्यालयपवनचक्कीपालकमंत्री प्रताप सरनाईक
Previous Post

शिवसेना धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनी खा ओमराजेंची यांची केली बोलतीच बंद

Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!