• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
August 27, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

गणपती बाप्पा, बळीराजाला मदत देण्यासाठी सरकारला सु्बुद्धी दे!
आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील पिकांची पाहणी
धाराशिव ता 27: जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत तुळजापूर तालुक्यातील शहापूर निलेगाव गुजनूर, वागदरी, नळदुर्ग, जळकोट, जळकोटवाडी येथे तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. आज गणेशाच आगमण होत असल्याने विघ्नहर्ता गणेशाकडे आमदार पाटील यांनी सरकारला सु्बुद्धी देण्याची प्रार्थना केली. एवढं नुकसान होऊनही सरकारचा प्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असेल तर शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
तुळजापूर तालुक्यामध्ये सरासरी 257 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यात नळदुर्ग महसुली मंडळामध्ये 316 मिमी, जळकोट 252 मिमी  पाऊस पडून अतिवृष्टी झालेली आहे. शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.  त्यामुळे  सर्वच पिकांचे  50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत,एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी सर्वस्वी या सरकारची व प्रशासनाची असणार आहे. त्यामुळे गणराया या सरकारच्या लोकांना व प्रशासनास बळीराजांच्या पाठीशी राहण्याची सु्बुद्धी दे अशी प्रार्थना आमदार पाटील यांनी केली आहे.

Tags: dharashivosmanabdअतिवृष्टीअनुदानआमदार कैलास पाटीलउस्मानाबादकर्जमाफीधाराशिवमदतकार्यमहायुती सरकारशेतकरी
Previous Post

बायकोच्या मदतीने मुलाने केला आईचा खून… लोहारा परिसरात एकच खळबळ

Next Post

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांचे आवाहन

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

गणेशोत्सव शांततेत व सुरक्षिततेत साजरा करण्याचे पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांचे आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!