• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईल – आ. राणाजगजितसिंह पाटील

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 1, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS


जिल्हा बँक राज्य सहकारी बँकेला चालवायला द्या ; जेणेकरून शेतकरी बांधवांना मदत होईल

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

अभुतपूर्व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अनेकांच्या शेतजमीन खरवडून गेली आहे.खरीप हातातून गेला आहे.अशा वेळी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा बॅक सक्षम व्हायला हवी. धाराशिव जिल्हा बँकेला सुस्थितीत आणण्यासाठी राज्य सहकारी बँकेला संस्थात्मक प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून शेतकरी बांधवांना सुरळीत कर्जपुरवठा सुरू होऊ शकेल. नागपूरप्रमाणे धाराशिव जिल्हा बँकेबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसे पत्रही मुख्यमंत्र्‍यांना देण्यात आले आहे. 

सुस्थितीत असलेल्या धाराशिव जिल्हा बँकेचे कंबरडे होमट्रेड रोखे घोटाळ्यामुळे मोडले. शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँक बंद पडली. त्यावेळेपासूनच शेतकऱ्यांचा कणा असलेल्या जिल्हा बँकेला उतरती कळा लागली. ४४० कोटी रुपयांच्या ठेवी देणारे तब्बल सहा लाख ठेवीदार आर्थिक अडचणीत सापडले. सन २००२ पासून म्हणजेच मागील २३ वर्षांपासून जिल्हा बँकेतून शेतकरी बांधवांना कर्जपुरवठा चक्क बंद आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी सावकारीच्या जोखडातून जावे लागत आहे.

नागपूर जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेकडून संस्थात्मक प्रशासकाची नेमणूक केली आहे. धाराशिव जिल्हा बँकेवरही अशाच प्रकारे संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेची नेमणूक झाल्यास बँकेला त्याचे मोठे फायदे होणार आहेत. राज्य सहकारी बँकेची सर्व साधने, संसाधने, तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारीवर्ग, निधी आणि मालमत्तेचा वापर जिल्हा बँकेला सक्षम करण्यासाठी होणार आहे. या माध्यमातून धाराशिव जिल्हा बँकेला राज्य सहकारी बँकेसोबत मिळून कर्जवितरणासह विविध उपक्रम राबवता येणार आहेत. असे झाल्यास धाराशिव जिल्हा बँकेला पूर्ववैभव प्राप्त होईल, असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

धाराशिव जिल्हा बँकेचा (आधीची उस्मानाबाद जिल्हा बँक) राज्यात दबदबा होता. त्यावेळी ही बँक आर्थिकद़ष्ट्या संपन्न होती. मात्र होमट्रेड रोखे घोटाळा आणि जाणीवपूर्वक मनमानी पद्धतीने केलेल्या कर्जवाटपामुळे बँक अडचणीत अडकली. या बँकेतून कर्जपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचीही कोंडी झाली. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून राज्य सहकारी बँकेची नेमणूक करणे अत्यावश्यक असल्याची मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कर्जाच्या रकमेची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या चलनाचाही सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यासाठी आर्थिक मदत करून राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यास ही समस्या दूर होऊ शकते. त्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्‍यांकडे ही महत्वाची मागणी केली आहे. या अनुषंगाने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्याशी देखील यशस्वी चर्चा केली असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv lokmadat newsआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

आर. पी. औषधनिर्माण महाविद्यालयात ‘जागतिक औषध निर्माता दिन’ आणि ‘शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

Next Post

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Related Posts

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या
महाराष्ट्र

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम
महाराष्ट्र

माऊली’ प्रकरणात ३१ ऑगस्टचा अल्टिमेटम

August 27, 2026
धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र

धाराशिवच्या औद्योगिक विकासाला ७५३४ कोटींची गुंतवणूक

August 25, 2026
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी
महाराष्ट्र

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

August 22, 2026
देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास
महाराष्ट्र

देशपांडे स्टँड परिसरातील रस्त्याने घेतला मोकळा श्वास

August 21, 2026
आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र

आरक्षण उपवर्गीकरण तत्काळ लागू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

August 20, 2026
Next Post

शेतकऱ्यांच्या न्यायासाठीची ठिणगी आता मशाल बनणार – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!