लोहारा–उमरगा विकासासाठी आनंद पाटील यांचा पाठपुरावा; दुष्काळ जाहीर करण्याची पालकमंत्र्यांकडे मागणी
लोहारा लोकविचार
लोहारा तालुक्याच्या विकासासाठी आनंद पाटील यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
रस्ते, पाणी, मूलभूत सुविधा यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधून ही कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
दरम्यान, लोहारा व उमरगा तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुके तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावेत, अशी आग्रही मागणीही आनंद पाटील यांनी केली. पावसाअभावी शेतीचे नुकसान होत असून आगामी पाणीटंचाईचा धोका लक्षात घेता शेतकरी व नागरिकांना शासनाच्या सर्व आवश्यक सवलती व मदत मिळावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विकासकामे असोत अथवा शेतकरी व सर्वसामान्यांचे प्रश्न—आनंद पाटील यांचा शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा निश्चितच कौतुकास्पद असून, त्यांच्या या प्रयत्नांना जनतेतून प्रोत्साहन मिळत आहे.
यावेळी महादेव जानकर, पंचायत समिती उपसभापती अमोल पाटील, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, मार्डीचे सरपंच श्रीमंत पाटील, नितीन सर कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786











