• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
August 22, 2026
in राजकारण
0
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
0
SHARES
20
VIEWS

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल; मल्हारदादा पाटलांच्या नेतृत्वात भाजपात जाण्याचा निर्णय

कळंब लोकविचार

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कोणतीही साधनसामग्री नसतानाही पक्षासाठी जीवाचे रान करून काम केले. आ. कैलास पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विजयासाठी शहरात मतदारांपर्यंत पोहोचून प्रामाणिकपणे संघर्ष केला. मात्र नगर परिषद निवडणुकीच्या वेळी ज्यांच्यासाठी एवढा संघर्ष केला, त्याच नेतृत्वाने कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली, असा घणाघाती आरोप करत उबाठा गटाचे नेते संजय मुंदडा यांनी आपल्या भाजप प्रवेशामागील भूमिका स्पष्ट केली.

मुंदडा यांनी सांगितले की, “ज्यांच्यासाठी आम्ही संघर्ष केला, त्यांनीच वेळ आली तेव्हा कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे अशा नेतृत्वासोबत पुढे का राहायचे, हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला.

”नगर परिषद निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात शिंदे गटाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काहींनी उघडपणे प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारच्या भूमिकांवर कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालण्यात आले. त्यामुळे हा केवळ कार्यकर्त्यांचा विश्वासघात नसून, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाशी आणि निष्ठावंत शिवसैनिकांच्या विश्वासाशी केलेली गद्दारी असल्याचे मुंदडा यांनी म्हटले.

नगर परिषद निवडणुकीनंतर शहरातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने अपेक्षा ठेवूनही कार्यकर्त्यांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. आमदार म्हणून नागरिकांच्या तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अपेक्षित ठोस भूमिका घेण्यात आली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

“आम्ही गप्प राहिलो, कारण आदेश होता”आजपर्यंत आपण जाणीवपूर्वक कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही, असे सांगताना संजय मुंदडा म्हणाले की, “आमदार राणादादांचा निरोप होता की कोणालाही काही बोलू नका. त्यामुळे आम्ही संयम ठेवला आणि गप्प राहिलो. मात्र आता तुम्हीच सुरुवात केली आहे, तर आम्हालाही सत्य बोलावे लागेल.”दरम्यान, युवा नेते मल्हारदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेत प्रत्यक्ष मदत केली.

विविध प्रश्न प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत ते सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात कोण उभे राहते आणि कोण पाठ फिरवते, यातील फरक स्पष्ट झाल्याचे मुंदडा यांनी नमूद केले. शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणारविश्वासघाताच्या राजकारणाला विकास आणि कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या राजकारणातून उत्तर देण्याचा निर्धार संजय मुंदडा यांनी व्यक्त केला. “आता निर्णय झाला आहे.

युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्या नेतृत्वात उबाठाचे शहरातील शेकडो कार्यकर्ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत,” अशी घोषणा त्यांनी केली.संजय मुंदडा यांनी घेतलेली भूमिका ही केवळ पक्षबदलाची नसून, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या स्वाभिमानाचा आवाज असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

कार्यकर्त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाला साथ देण्याचा निर्णय मुंदडा यांनी घेतला असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadLokvichar लोकविचारआमदार कैलास पाटीलआमदार राणाजगजितसिंह पाटीलधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकपक्षप्रवेश
Previous Post

लोकविचार इम्पॅक्ट : २४ तासांत रस्त्यावर उतरली वाहतूक यंत्रणा

Next Post

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?
राजकारण

धाराशिव’ नामांतर झाले, तरी ‘उस्मानाबाद’ कायमच कसे?

August 16, 2026
Next Post
लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

लातूरचे उमेश सांगळे राज्याध्यक्षपदी

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!