• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 21, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


लाडक्या बहिणींच्या अर्जांतील त्रुटी मिशन मोडवर दूर करा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रशासनाला निर्देश

धाराशिव / लोकमदत न्यूज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बहिणीला मिळालाच पाहिजे, त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाला ‘मिशन मोड’वर लाडक्या बहिणींच्या अर्जातील तांत्रिक त्रुटी आणि चुकीच्या माहितीमुळे रखडलेली ३८ हजार ८११ बहिणींची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने माता भगिनींनी लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, तब्बल ३८ हजार ८११ अर्जांमध्ये माहिती भरताना चुका झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या माता भगिनींची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. पर्यायाने त्यांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. हक्काच्या आर्थिक मदतीपासून लाडक्या बहिणी वंचित राहू नयेत, यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी निर्देश दिले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पूजार यांना हे प्रकरण प्राधान्याने हाताळण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेतली असून, शनिवारी या संबंधित सर्व यंत्रणांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत प्रलंबित ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करून करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले जाणार आहेत.


एकाही पात्र भगिनी वंचित राहता कामा नये : आमदार पाटील

जिल्ह्यातील अनेक माता-भगिनी केवळ तांत्रिक कारणास्तव योजनेच्या लाभापासून वंचित आहेत, हे चिंताजनक आहे. प्रशासनाने समन्वयाने काम करून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. महिलांनीही आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपले ई-केवायसी अपडेट करून घ्यावे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

Previous Post

अजितदादांच्या सासरवाडीत नगर परिषदेत पडला विसर !श्रद्धांजली अर्पण करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये का नाही ?

Next Post

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Next Post

आंबेवाडी येथील गृहनिर्माण घोटाळ्याची चौकशी करा – सभासदांसह ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.