• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश.आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

wp@dktechs.in by wp@dktechs.in
October 26, 2025
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


धाराशिवकरांसाठी मोठा दिलासाः शहरातील रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश

जनतेच्या साठ कोटींची बचत!

लवकरच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव शहरातील रस्त्यांचा रखडलेला प्रश्न आता निकाली निघाला आहे. निविदेतील २०२३-२४ च्या अंदाजपत्रकीय दरानेच ही सगळी कामे होणार आहेत. त्यामुळे आजच्या दराची तुलना केली असता सरकारचे अर्थात जनतेचे जवळपास साठ कोटी रुपये वाचणार आहेत. तुळजापूर आणि नळदुर्गबरोबरच हे काम सुरू झाले असते तर, कदाचित आत्तापर्यंत सत्तर टक्के काम पूर्णही झाले असते. आता कार्यारंभ आदेश झाले आहेत. लवकरच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते धाराशिव शहरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

प्रतिष्ठान भवन येथे शनिवारी या अनुषंगाने महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शहरातील रस्त्यांच्या कामाचा प्रश्न आता निकाली निघाला असून लवकरच कामास सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. या कामांसाठी एकूण १८ महिन्यांची कालमर्यादा असली तरीही कालमर्यादेच्या आत ही सगळे रस्ते अगदी दर्जेदाररित्या पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी नमूद केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या पाठपुराव्याला मोठे बळ दिले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या कामाला आता प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. आपण स्वतः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन धाराशिव येथील भूमिपूजन कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. तिन्ही मान्यवरांनी अनुमती दिलेली आहे. तारीख निश्चित झाल्यावर तातडीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच बळ दिले आहे. आपल्या धारशिव शहरासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांसाठी १४० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष बाब म्हणून धाराशिव शहरासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. शहरातील रस्त्यांसाठी एवढा ऐतिहासिक निधी यापूर्वी कधीही मिळाला नव्हता. या निधीच्या माध्यमातून शहरातील रस्त्यांचे काम आता वेगात केले जाणार आहे. आपल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष सहकार्यातून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १४० कोटी रूपयांच्या या विशेष प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, पालकमंत्री प्रताप सरनाईक, संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांचेही यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे. वरील सर्वांचे सबंध धाराशिव शहरवासीयांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवादही मानले आहेत.

Tags: dharashiv collectordharashiv livedharashiv lokmadat newsआमदार कैलास पाटीलआमदार तानाजीराव सावंतआमदार प्रवीण स्वामीआमदार राणाजगजितसिंह पाटीलउपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेखासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकधाराशिव शहर विकासनगर परिषद धाराशिवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

राजमुद्रा कट्टा नव्या तेजात… युवा उद्योजक राहुल गवळींचा स्वखर्चातून पुढाकार.. दिवाळीच्या प्रकाशात उजळला छत्रपती शिवाजी महाराज चौक

Next Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा…

Next Post

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये 25 वर्षानंतर रंगला 60जणांचा स्नेह मेळावा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.