• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकरी बांधव अडचणीत

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 21, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS

मुरूम मंडळात अतिवृष्टीचा तडाका…. खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान…. शेतकरी बांधव अडचणीत….

मुरुम (प्रतिनिधी) : महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले असून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरुम शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे. गेल्या आठवड्यात आलूर परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली पिके संपूर्ण वाहून गेली. तर कदेर परिसरासह मुरुम परिसरातील गडीशिवार, खारोळी यांसह अनेक ठिकाणी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. मुरुमजवळील बेनीतुरा साठवण तलाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडपाण्यातून येत असलेल्या पाण्यामुळे नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शेतमाल व पिके वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शनिवारी (ता. २०) रोजी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे मुरुम शहरातील किसान चौक ते आष्टा कासार मार्गावरील प्रमुख पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले. परिणामी नागरिक, शाळकरी विद्यार्थी, नोकरदार व व्यावसायिकांना प्रवासासाठी ७ किमी अंतराऐवजी तब्बल ३०-३५ किमी वळसा घ्यावा लागत आहे. तसेच मुरुम-अक्कलकोट मार्गावरील बेळंबजवळील पुलावरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली. परिणामी मुरूम अक्कलकोट मार्गावरील सर्वच वाहतूक सेवा पूर्णता बंद करण्यात आली होती पुलावरील पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. काही तरुणांनी मात्र धोकादायक टवाळक्या करत पाण्याचा मोठा प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले.

दरम्यान, या परिस्थितीची दखल घेत मुरुम शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मात्र संपूर्ण घटनेने आक्रमक होत पहाटेपासूनच घटनास्थळी दाखल झाले. महसूल, कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलिस प्रशासनाशी संपर्क साधत पंचनामे व पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ व सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली, त्यावेळी शेतकऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी तहसील प्रशासनाविरोधात मात्र शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटला आहे. उमरगा तालुक्याचे तहसीलदार गोविंद येरमे हे दोन दिवसापूर्वी स्थानिक नेत्यांच्या वाहनातून पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना “मुरुम महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नाही” असे वक्तव्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष नुकसानीकडे बोट दाखवत तहसीलदारांवर रोष व्यक्त केला. सध्या शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाचिटणीस दत्तात्रय इंगळे, युवक शहराध्यक्ष बाबा कुरेशी, लखन भोंडवे, इमरान सय्यद, जावेद ढोबळे किशोर शिंदे, बालाजी मंडले यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता.

लोकमदत न्यूज “सत्य शोधून लिहिण्याची ताकद”

संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsdharashiv osmanabadkrishi mantriआपत्तीग्रस्त शेतकरीकर्जमाफी अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवतहसीलदार उमरगादत्तात्रय भरणे कृषिमंत्रीपालकमंत्री प्रतापराव सरनाईकलोहारा
Previous Post

टुडे समाचार संपादक हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन

Next Post

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात स्थानिक कलावंतांना संधी द्या, अन्यथा आंदोलन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ईशारा

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवात स्थानिक कलावंतांना संधी द्या, अन्यथा आंदोलन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ईशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

ड्रग्सचा तपास ठप्प, वरिष्ठ अधिकारी आश्वासन देऊन गप्प!

August 31, 2026
धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाईचा इशारा!

August 31, 2026
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे नातू पंचायत समिती सदस्य रणवीर यांचा वेदिकासोबत साखरपुडा

August 30, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!