• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
July 29, 2026
in Uncategorized
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिर्डीहून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअपला कंटेनरची भीषण धडक; दोघांची प्रकृती गंभीर

धाराशिव लोकविचार

शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परत येत असलेल्या भाविकांच्या पिकअप वाहनाला कंटेनरची भीषण धडक बसल्याने २२ ते २३ भाविक जखमी झाल्याची घटना बुधवारी रात्री येडशी टोलनाक्यापुढे ढोकी रोड टी पॉइंट आळणी पाटीजवळ घडली. या अपघातात दोघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२५ पी-४००३ क्रमांकाच्या पिकअप वाहनातून उमरगा तालुक्यातील नारगवाळी, बोरी आणि मातोळा येथील भाविक शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतत होते. याच दरम्यान येडशी टोलनाक्यापुढे ढोकी रोडवरील टी पॉइंट आळणी पाटीजवळ पिकअप आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की वाहनातील अनेक भाविक गंभीर जखमी झाले. वाहनात मोठ्या संख्येने महिला भाविकांचाही समावेश असल्याचे देखील बोलले जात आहे.

अपघात होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतकार्य सुरू केले. पोलिस आणि मदत पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय धाराशिव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जखमींची संपूर्ण नावे आणि अपघाताबाबतची अधिकृत माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.

पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू असून, अधिकृत माहितीनंतर जखमींची ओळख व अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 083900 88786

Previous Post

धाराशिव नगर परिषदेच्या १७ कोटींच्या निविदांवर प्रश्नचिन्ह

Next Post

NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Next Post
NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

NCMC स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

Recent Posts

  • ‘माऊली’च्या नावावर कोट्यवधींचा खेळ?
  • पत्रकारांच्या प्रश्नांसाठीचा लढा आणखी तीव्र करणार : संदीप काळे
  • ‘लाडक्या ठेकेदाराच्या’ कामावर नागरिकांचा संताप
  • पवनचक्कीचे साहित्य चोरणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
  • तुळजापूरला आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी कळंबच्या ड्रग्ज प्रकरणात गप्प का?

Recent Comments

  1. vvhfntlqni on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  2. lsogddnnxq on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  3. Kristian Mkt on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
  4. shpnjwdonp on नववर्षाची भेट : १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण
  5. Austen Web on खरीप २०२० पीकविम्याचे रु. १३४ कोटी जिल्हा कृषी कार्यालयाकडे वर्ग आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.