आळणी येथे विद्यार्थीनींना छेडछाड करणाऱ्या टोळक्यांकडून मारहाण करुन दहशत पवन पौळचे विनाकारण जातीय दुही माजविण्याचे कारस्थान.!
मातंग समाजातीलच वृध्द महिलेसह पुरुषांना कोयता व दगडाने बेदम मारहाण सरपंच प्रमोद वीर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
धाराशिव लोकविचार
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील सरपंच प्रमोद वीर हे मातंग समाजावर अन्याय करीत असल्याचा कांगावा पवन पौळ करीत आहे. या माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल असे भासवून दोन समाजात दुही पसरविण्याचे घृणास्पद काम पौळ व मंडळी करीत आहेत. मात्र, मातंग समाजासह इतर समाजातील विद्यार्थिनींची छेडछाड केली असल्याने त्याचा जाब मातंग समाजातीलच एका बहिणीच्या भावाने संबंधितांना विचारला. त्याचा राग मनात धरून भावासह वडील,भाऊ व आजीला कोयता व दगडाने जबर मारहाण करून जखमी केले. त्या जखमींची पौळ किंवा मातंग समाजातील इतर कोणीही साधी विचारपूस देखील केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीवाद किंवा राजकारण यांचा अजिबातच संबंध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, या माध्यमातून आळणी गावची नाहक बदनामी होत असून असले घाणेरडे प्रकार तत्काळ थांबवावेत अशी ग्रामस्थांमधून सूर उमटू लागले आहेत.
धाराशिव तालुक्यातील आळणी येथे मातंग समाजातील पवन पौळ यांच्यासह इतर मातंग समाजातील गुंड प्रवृत्तीच्या गुंडांनी शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप करीत विद्यार्थिनींना पाहून अंगावर थुंकणे, चित्र विचित्र हावभाव करणे, व्यंगात्मक बोलणे व मोटारसायकलचा कट मारणे असे प्रकार वाढले आहेत. इतर समाजातील मुलींसह मातंग समाजातीलच एका मुलीलाही हा प्रकार सहन न झाल्याने तिने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित पीडित बहिणीच्या भावाने संबंधितास याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून संध्याकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास ४-५ गुंड हातात कोयता, कुऱ्हाड व दगड घेऊन घरी गेले. त्यावेळी… तिच्या भावास घराबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना त्याची आजी सोडविण्यासाठी आली असता तिला दगडाने मारहाण केली. तसेच त्या मुलाचे वडील सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही कोयत्याने मारहाण करून जबर जखमी केले आहे.
त्या गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जखमींना दवाखान्यात उपचारसाठी घेऊन जाण्यास कोणीही तयार होईना. त्यामुळे जखमी कुटुंबाने सरपंच प्रमोद वीर यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला व दवाखान्यात नेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी त्यांची स्वतःचे वाहन ड्रायव्हर पाठवून त्यांना धाराशिव येथील दवाखान्यात घेऊन जाऊ लागले. त्यावेळी त्या गुंडाने झोपडपट्टी परिसरात त्यांचे वाहन अडवून त्यावर दगडफेक केली. हा प्रकार पाहून ग्रामस्थ जमा झाल्याने ते पळून गेले. ते जखमी झालेले मातंग समाजातील व्यक्ती चार-पाच दिवस दवाखान्यात उपचार घेत होते.
त्यावेळी त्यांना विचारपूस करण्यासाठी पवन पौळ किंवा इतर बांधव कोणीही गेले नाही किंवा साधे विचारले देखील नाही. मात्र मदत करणाऱ्यांनाच जातीयवादी ठरवून त्यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ती अत्यंत खेदजनक असून गावातील तक्रारीचे निवारण करणाऱ्या प्रथम नागरिक असणाऱ्या व्यक्तीलाच …..निशाणा…मोहरा…बनविण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गावात सौहार्दाचे वातावरण रहावे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे गावकऱ्यांमधून तीव्र खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे पवन पौळ प्रकरण हे वैयक्तिक स्वार्थासाठी व आपली दहशत आणि दबदबा निर्माण करण्यासाठी केलेला बनाव असल्याचे गावकऱ्यांनी / पीडित कुटुंबाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने आळणी प्रकरणी जे कथित आंदोलन करीत सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला व वीर यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्ज दिले आहेत. ते पवन पौळ यांच्या अवैद्य धंदे व गावात वाढलेली गुंडगिरी यावर पांघरून घालण्याचा प्रकार आहे. मात्र, पैशाच्या जोरावर काही मंडळींना हाताशी धरून आंदोलन करून सरपंच वीर व आळणी गावची बदनामी करण्याचे षडयंत्र राबविले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः पौळ यांच्या माध्यमातून सुरू केलेला घृणास्पद प्रकाराची प्रत्यक्ष गावास भेट देऊन खात्री करून योग्य ती पावली उचलावीत. तसेच यापुढे अशा पद्धतीचे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार होणार नाहीत यासाठी योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786
मातंग समाजातीलच वृध्द महिलेसह पुरुषांना कोयता व दगडाने बेदम मारहाण सरपंच प्रमोद वीर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न
धाराशिव लोकविचार
धाराशिव तालुक्यातील आळणी येथील सरपंच प्रवीण वीर हे मातंग समाजावर अन्याय करीत असल्याचा कांगावा पवन पौळ करीत आहे. या माध्यमातून जातीय तेढ निर्माण होईल असे भासवून दोन समाजात दुही पसरविण्याचे घृणास्पद काम पौळ व मंडळी करीत आहेत. मात्र, मातंग समाजासह इतर समाजातील विद्यार्थिनींची छेडछाड केली असल्याने त्याचा जाब मातंग समाजातीलच एका बहिणीच्या भावाने संबंधितांना विचारला. त्याचा राग मनात धरून भावासह वडील,भाऊ व आजीला कोयता व दगडाने जबर मारहाण करून जखमी केले.
त्या जखमींची पौळ किंवा मातंग समाजातील इतर कोणीही साधी विचारपूस देखील केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा जातीवाद किंवा राजकारण यांचा अजिबातच संबंध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, या माध्यमातून आळणी गावची नाहक बदनामी होत असून असले घाणेरडे प्रकार तत्काळ थांबवावेत अशी ग्रामस्थांमधून सूर उमटू लागले आहेत.
धाराशिव तालुक्यातील आळणी येथे मातंग समाजातील पवन पौळ यांच्यासह इतर मातंग समाजातील गुंड प्रवृत्तीच्या गुंडांनी शालेय विद्यार्थिनींची छेडछाड करण्याचे सत्र सुरू असल्याचा आरोप करीत विद्यार्थिनींना पाहून अंगावर थुंकणे, चित्र विचित्र हावभाव करणे, व्यंगात्मक बोलणे व मोटारसायकलचा कट मारणे असे प्रकार वाढले आहेत.
इतर समाजातील मुलींसह मातंग समाजातीलच एका मुलीलाही हा प्रकार सहन न झाल्याने तिने तिच्या भावाला हा प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित पीडित बहिणीच्या भावाने संबंधितास याबाबत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून संध्याकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास ४-५ गुंड हातात कोयता, कुऱ्हाड व दगड घेऊन घरी गेले. त्यावेळी… तिच्या भावास घराबाहेर बोलावून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना त्याची आजी सोडविण्यासाठी आली असता तिला दगडाने मारहाण केली. तसेच त्या मुलाचे वडील सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही कोयत्याने मारहाण करून जबर जखमी केले आहे.
त्या गुंडांची दहशत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जखमींना दवाखान्यात उपचारसाठी घेऊन जाण्यास कोणीही तयार होईना. त्यामुळे जखमी कुटुंबाने सरपंच प्रमोद वीर यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला व दवाखान्यात नेण्याची विनंती केली. त्यानुसार त्यांनी त्यांची स्वतःचे वाहन ड्रायव्हर पाठवून त्यांना धाराशिव येथील दवाखान्यात घेऊन जाऊ लागले. त्यावेळी त्या गुंडाने झोपडपट्टी परिसरात त्यांचे वाहन अडवून त्यावर दगडफेक केली. हा प्रकार पाहून ग्रामस्थ जमा झाल्याने ते पळून गेले. ते जखमी झालेले मातंग समाजातील व्यक्ती चार-पाच दिवस दवाखान्यात उपचार घेत होते.
त्यावेळी त्यांना विचारपूस करण्यासाठी पवन पौळ किंवा इतर बांधव कोणीही गेले नाही किंवा साधे विचारले देखील नाही. मात्र मदत करणाऱ्यांनाच जातीयवादी ठरवून त्यांच्या विरोधात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ती अत्यंत खेदजनक असून गावातील तक्रारीचे निवारण करणाऱ्या प्रथम नागरिक असणाऱ्या व्यक्तीलाच …..निशाणा…मोहरा…बनविण्याचा कुटील डाव रचला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गावात सौहार्दाचे वातावरण रहावे यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे गावकऱ्यांमधून तीव्र खंत व्यक्त होत आहे. त्यामुळे पवन पौळ प्रकरण हे वैयक्तिक स्वार्थासाठी व आपली दहशत आणि दबदबा निर्माण करण्यासाठी केलेला बनाव असल्याचे गावकऱ्यांनी / पीडित कुटुंबाने स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी पुजार यांनी गावात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घ्यावी
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने आळणी प्रकरणी जे कथित आंदोलन करीत सरपंच प्रमोद वीर यांच्याविरोधात तक्रारीचा पाढा वाचला व वीर यांच्यावर कारवाई करण्यासाठी अर्ज दिले आहेत. ते पवन पौळ यांच्या अवैद्य धंदे व गावात वाढलेली गुंडगिरी यावर पांघरून घालण्याचा प्रकार आहे.
मात्र, पैशाच्या जोरावर काही मंडळींना हाताशी धरून आंदोलन करून सरपंच वीर व आळणी गावची बदनामी करण्याचे षडयंत्र राबविले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी स्वतः पौळ यांच्या माध्यमातून सुरू केलेला घृणास्पद प्रकाराची प्रत्यक्ष गावास भेट देऊन खात्री करून योग्य ती पावली उचलावीत. तसेच यापुढे अशा पद्धतीचे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रकार होणार नाहीत यासाठी योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786



