देशपांडे स्टँड ते बाजार चौक रस्त्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात नागरिकांच्या समस्येसाठी सातत्याने लढणाऱ्या रवि मुंडे यांच्या मागणीची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतली दखल
व्यापारी व वाहनचालकांमध्ये समाधान
धाराशिव लोकविचार शहरातील देशपांडे स्टँड ते बाजार चौक हा मुख्य आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून खड्डेमय झाला होता. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच वाहनचालकांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्याच्या तोंडावर या मार्गाची अवस्था आणखी बिकट होत चालल्याने अपघातांचा धोका वाढला होता. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा नेते रवि मुंडे यांनी पुढाकार घेत सातत्याने पाठपुरावा केला.दिनांक १५ मे रोजी रवि मुंडे यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन नागरिकांच्या वतीने निवेदन सादर केले होते. शहरातील हजारो नागरिकांच्या दैनंदिन वापरातील हा महत्त्वाचा मार्ग तातडीने दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली होती. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व्यापारी वर्गाचे नुकसान होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिले.रवि मुंडे यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. रस्त्याची पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून देत दुरुस्तीचे काम विलंब न करता सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. आमदारांच्या सकारात्मक भूमिकेला रवि मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची जोड मिळाल्याने अखेर या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक आणि वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, केवळ तक्रार करून न थांबता प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या रवि मुंडे यांच्या कार्यपद्धतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.स्थानिक प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे रवि मुंडे हे गेल्या काही काळात विविध विषयांवर प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. देशपांडे स्टँड ते बाजार चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामालाही त्यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.यावेळी रवि मुंडे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील तसेच युवा नेते मल्हार पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने प्रतिसाद देत रस्त्याच्या दुरुस्तीला चालना दिल्याबद्दल त्यांनी दोन्ही नेत्यांचे विशेष आभार मानले. भविष्यातही शहरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आपण अशाच प्रकारे सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.देशपांडे स्टँड ते बाजार चौक या मार्गावरील सुरू झालेल्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक अधिक सुरक्षित होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे रवि मुंडे यांच्या कार्याची पुन्हा एकदा चर्चा होत असून नागरिकांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


