• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”

Sarvsamany Lokvichar by Sarvsamany Lokvichar
June 27, 2026
in राजकारण
0
“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”
0
SHARES
66
VIEWS

“बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर?”

बातमी आमच्याकडून… जाहिरात दुसरीकडून; मग सकारात्मक बातमीची अपेक्षा कशाच्या जोरावर? दररोज रस्त्यावर वस्तुनिष्ठ बातमी प्रसारित करणारा 

 सामान्य पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. एखाद्या नेत्याची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवणे, विकासकामांची माहिती देणे, समस्या मांडणे आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे काम सामान्य (स्थानिक) पत्रकार सातत्याने करत असतो. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे अनेक राजकारण्यांची पत्रकारांबाबतची भूमिका केवळ सोयीनुसार बदलताना दिसते.

सकारात्मक बातमी हवी असेल, विरोधकांवर टीका प्रसिद्ध करून घ्यायची असेल किंवा स्वतःची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवायची असेल, तेव्हा मात्र न विसरता सर्वात प्रथम सामान्य पत्रकारांची आठवण होते. बातमीत नाव राहिले तर लगेच फोन येतो. एखादी बातमी पसंत पडली नाही तरी पत्रकारांना जाब विचारला जातो.

परंतु जाहिरातीची वेळ आली की चित्र पूर्णपणे बदलते. “आर्थिक अडचण आहे”, “नंतर पाहू” खूप अडचणीत आहे, सध्या परिस्थिती नाही, वर्ष झाले एक काम नाही, बिल निघाले नाही अशी कारणे दिली जातात. त्याचवेळी शहरभर लाखो रुपयांची होर्डिंग्ज झळकतात आणि मोठ मोठ्या वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात. विडंबना अशी की, ज्या मोठ्या माध्यमांकडून याच कार्यकर्त्यांची साधी चौकटही प्रसिद्ध होत नाही, बातमीमध्ये त्यांचे नाव कधीच घेतले जात नाही. कधी बातमी घेतलीच तर अगदी कमी शब्दांत तेही थोडक्यात घेतली जाते. मात्र त्यांच्यावर जाहिरातीचा मोठा खर्च केला जातो; पण हाक मारल्याबरोबर एक फोन केला की रोज सोबत उभ्या राहणाऱ्या स्थानिक पत्रकारांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.

सामान्य पत्रकारांना कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसते. जाहिराती हेच त्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असते. तरीही त्यांच्याकडून कायम सकारात्मक बातम्यांची अपेक्षा ठेवली जाते. मग प्रश्न असा पडतो की, ज्या पत्रकारांच्या माध्यमातून स्वतःची बाजू जनतेपर्यंत पोहोचवली जाते, त्यांनाच आर्थिकदृष्ट्या साथ देण्यास का कचरले जाते?

राजकारण्यांनी किमान जनाची नाही तर मनाची तरी बाळगावी. कारण सामान्य पत्रकारच जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत आणि तुमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे स्थानिक पत्रकारांचा सन्मान आणि त्यांना जाहिरातीच्या माध्यमातून न्याय देणे ही केवळ जबाबदारीच आहे.

लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: dharashiv collectordharashiv osmanabadosmanabadआमदार कैलास पाटीलउस्मानाबादधाराशिवधाराशिव जिल्हा पालकमंत्री प्रताप सरनाईकराजकारण
Previous Post

जप्त फ्रेमची चोरी ? सुट्टीच्या दिवशी कारनामा, आशीर्वाद कोणाचा ?

Next Post

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम

Related Posts

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;
राजकारण

नगरसेवकाच्या पक्षप्रवेशानंतर प्रभाग ९ मध्ये बॅनरबाजी;

August 27, 2026
राजकारण

August 27, 2026
आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;
राजकारण

आ. कैलास पाटलांच्या नेतृत्वावर संजय मुंदडांचा हल्लाबोल;

August 22, 2026
तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;
राजकारण

तामलवाडी टोलनाका परिसरातील स्थानिकांच्या रोजगारासाठी काँग्रेसचा एल्गार;

August 21, 2026
वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का
राजकारण

वडगाव (सि.) येथे उबाठा गटाला धक्का

August 18, 2026
घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!
राजकारण

घाटंग्री येथे आरक्षण उपवर्गीकरणा विरोधात बोलणाऱ्या दांपत्यावर प्राणघातक हल्ला!

August 17, 2026
Next Post
मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम

मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना बेबी किट व चांदीच्या नाण्यांचे वाटप; प्रवीण माळी यांचा सामाजिक उपक्रम

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!