आज मुस्लिम समाजातील ५१ जोडप्यांचे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन – हुसैनी
धाराशिव – सर्वसामान्य लोकविचार
हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाझी (रहे.) वेलफेअर सोसायटी, उस्मानाबाद यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सामुदायिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून सलग १८ वे वर्ष आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटुंबांना आधार देणाऱ्या या उपक्रमात यंदा ५१ जोडप्यांचे विवाह रविवार दि.१९ एप्रिल रोजी पार पडणार आहेत.धाराशिव शहरातील गाझी मैदानावर सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध नियोजनासह हा सोहळा पार पाडण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने विवाह करण्याचा संदेश समाजात दिला जात आहे. त्यामुळे या उपक्रमास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळालेला आहे. तसेच आज करण्यात येणाऱ्या या पुण्य कार्यात नागरिकांनी सहभागी होऊन वधू-वरांना आशीर्वाद देण्यासह या सामाजिक कार्याला बळकटी देण्यासह सामाजिक एकोपा वाढविण्यासाठी या सामाजिक कार्यक्रमास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक सय्यद नादेरुल्लाह हुसैनी यांनी केले आहे.


