• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 25, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS


सरसकट मदत जाहीर, तरीही आ. राणा पाटील
पायाला भिंगरी, शेतकऱ्यांसाठी मैदानातच

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह बार्शी तालुक्यात नुकसानीची पाहणी
धाराशिव जिल्ह्यात १३ सप्टेंबरला रात्रभर मुसळधार पाऊस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मित्रचे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजतिसिंह पाटील यांनी बाहेर पडून शेतकऱ्यांना धीर द्यायला सुरुवात केली होती. विविध भागांत जाऊन त्यांनी नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून दिली. या घोषणेच्या दुसऱ्या दिवशीही राणादादा यांनी बाहेर पडून पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

बार्शी तालुक्यातील गौडगाव, उपळे (ज), जामगाव आदी गावे धाराशिव तालुक्याला लागूनच आहेत. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी या भागाच्य़ा दौऱ्यावर होते. त्यांच्यासमवेत राणादादांनीही या भागातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. या परिसरातही  सोयाबीनसह फळबागांचे अपरिमित नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांशी पालकमंत्री गोरे आणि आ. पाटील यांनी संवाद साधून त्यांना धीर दिला.

आपले महायुती सरकार शेतकरी बांधवांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. नुकसान अभूतपूर्व असल्याने मदतही अभूतपूर्वच असायला हवी, अशी आपली आग्रही मागणी आहे. त्यानुसार सर्व निकष बाजूला सारत सरसकट मदतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आपले सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे पालकमंत्री गोरे, आ.पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. यावेळी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यातही आ.पाटील यांनीकेली पाहणी


मुख्यमंत्री यांच्या सोबतचा औसा पाहणी दौरा केल्यानंतर आ.पाटलांनी लगेच तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, होनाळा, बारुळ, बसवंतवाडी, येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अतिवृष्टी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे येथील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला सारून सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात येईल, अशी मोठी घोषणा  केली आहे. आपले सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. सरसकट मदत मिळेपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच आहे, अशा शब्दांत राणादादांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

सोयाबीनचा यावर्षीचा पीक विमा मोठ्या प्रमाणात मिळू शकतो. पीक कापणी प्रयोग मात्र व्यवस्थित करून घेणे आवश्यक आहे. त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महादेव जाधव, आनंद कंदले, उमेश पाटील, निशिगंधा पाटील, अनिल बंडगर, गोविंद हुलवणकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags: आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनधाराशिव atiwrushthi madat अतिवृष्टी अनुदान मदतकार्य आमदार खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कार्यालय dharashiv osmanabad
Previous Post

शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ श्री तुळजाभवानी देवींची नित्योपचार

Next Post

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

Related Posts

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक
कृषी

‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करूया’ – पालकमंत्री प्रताप सरनाईक

August 17, 2026
मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील
कृषी

मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेचे मंत्री गोरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – सौ. अर्चना पाटील

July 23, 2026
शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील
कृषी

शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय; कर्जमाफीतील जाचक अटी सरकार ला घ्याव्या लागल्या मागे – प्रतापसिंह पाटील

July 11, 2026
“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”
कृषी

“महसूल विभागाचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या जीवावर! कालवा नसतानाही ७/१२ वरून २८ गुंठे जमीन गायब; न्याय मिळण्यासाठी कुटुंबाचे आमरण उपोषण सुरू”

July 7, 2026
गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश
कृषी

गोगलगाईच्या प्रादुर्भावाने सोयाबीन धोक्यात आ. कैलास पाटील यांचा कृषिमंत्र्यांना थेट फोन, तातडीच्या पंचनाम्यांचे आदेश

July 4, 2026
ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील
कृषी

ढोकीतील वीजपुरवठा सुरळीत करा, सब-स्टेशन क्षमता वाढवा…रुपामाता फाऊंडेशन सचिव अँड. अजित गुंड पाटील

June 5, 2026
Next Post

विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे उद्या धाराशिव जिल्ह्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

कळंब ड्रग्ज प्रकरण : पालकमंत्र्यांच्या आदेशानंतरही स्थानिक पोलिसांची कारवाई संथ

August 28, 2026
ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

ग्रामसखींना १५ हजार मानधनासह १० लाखांचे विमा संरक्षण द्या

August 27, 2026
अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

अचलेर गावगुंड स्वामीसह त्याच्या टोळीवर कारवाई करा!

August 27, 2026
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026

error: Content is protected !!