• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

धाराशिव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार आमदारांची मदतीची मागणी

wp@dktechs.in by wp@dktechs.in
September 24, 2025
in कृषी
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खासदार-आमदारांचे निवेदन
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) – धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाभर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, मका, फळबागा, ऊस यासह इतर पिके उद्ध्वस्त झाली असून नद्या-नाले तुडुंब भरल्याने अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संकटात सापडले असून त्यांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील व आमदार प्रवीण स्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना उभा हंगाम वाया गेला असून कुटुंबाचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व मजुरांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
धाराशिव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील बदललेले निकष रद्द करून जुने निकष कायम ठेवावेत.
मिरज-कोल्हापूरप्रमाणेच अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करावी.
पुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल, बंधारे, तलाव व वीज यंत्रणा तातडीने दुरुस्त करावी.
जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना, बहुभुधारक शेतकऱ्यांसह मदत द्यावी.
पुरात वाहून गेलेल्या पशुधनाची बाजारमूल्यानुसार भरपाई करावी.
घर, जनावरांचे गोठे व मजुरांची घरे पडझड झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
पंजाबप्रमाणेच महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी.
या सर्व मागण्यांकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

लोकमदत न्यूज संपादक अमजद सय्यद 8390088786

Tags:  dharashiv collectordharashiv lokmadat newsअतिवृष्टीअनुदानआमदार कैलास पाटीलआमदार प्रवीण स्वामीओला दुष्काळखासदार ओमराजे निंबाळकरधाराशिवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशेतकरी
Previous Post

धाराशिव शहरातील अवैध जाहिराती, फलक व होर्डिंग तात्काळ हटवा – अन्यथा… जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नगरपालिका ॲक्शन मोडमध्ये.!

Next Post

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौरा

Next Post

धाराशिव पूरस्थितीचा आढावा : उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री सरनाईक व आमदार सावंत यांचा शेतात थेट दौरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.