• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

wp@dktechs.in by wp@dktechs.in
February 26, 2026
in सामाजिक
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोरड्या विहिरीत अडकलेल्या चार पिल्लांना जीवदान नगरसेवक अभिजित पतंगे यांची तत्पर धाव

धाराशिव लोकमदत न्यूज

धाराशिव नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील जिजाऊ नगर परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरड्या विहिरीमध्ये चार लहान कुत्र्यांची पिल्ले पडल्याची धक्कादायक घटना समोर आली. विहिरीत उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पायऱ्या नसल्यामुळे पिल्लांना बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. दोन दिवसांपासून पिल्ले विहिरीत अडकून पडल्याने त्यांना अन्न-पाण्याची तीव्र अडचण निर्माण झाली होती आणि त्यांचा मृत्यू होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली होती.
स्थानिक रहिवाशांनी नगरपालिकेतील प्रमुख लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचे दिसून आले. अखेर नागरिकांनी प्रभागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक अभिजित पतंगे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. घटनेची माहिती मिळताच पतंगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीची पाहणी करून पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांनी तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी सचिन कदम यांच्याशी संपर्क साधला. दोरीच्या सहाय्याने सचिन कदम हे विहिरीत उतरले आणि बकेटच्या मदतीने एकामागून एक चारही पिल्लांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी आणि तत्पर कार्यामुळे चार निष्पाप जीवांना अक्षरशः नवजीवन मिळाले. नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या संवेदनशील आणि जबाबदार भूमिकेचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
या कार्यात उमेश चव्हाण, अजिंक्य शिंदे आणि सचिन कदम यांनीही मोलाचे सहकार्य केले. जिजाऊ नगरमधील नागरिकांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानत, “अडचणीच्या वेळी धावून येणारा लोकप्रतिनिधीच खरा” अशी भावना व्यक्त केली.
नगरसेवक अभिजित पतंगे यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींनी केवळ विकासकामेच नव्हे तर सामाजिक जबाबदारीही पार पाडली पाहिजे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद

संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान तातडीने पंचनामे करा – डॉ.प्रतापसिंह पाटील

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर “या” ताराखेला होणार निवड

Next Post

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर "या" ताराखेला होणार निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.