वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्यांना कळंब / अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सारख्या ठिकाणी ‘क्रीम पोस्टिंग जिल्ह्यात खळबळ पोलीस कारभारावर प्रश्नचिन्ह!
धाराशिव लोकविचार
जिल्हा पोलीस दलातील दोन वादग्रस्त अधिकाऱ्यांना पुन्हा महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती देण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मारुती शेळके यांच्यावर येडशी परिसरातील खून प्रकरणात कथितरीत्या खोटा गुन्हा दाखल करून आर्थिक तडजोड केल्याचे आरोप यापूर्वी चर्चेत आले होते. या प्रकरणाचा पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी सखोल तपास करून संबंधित अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आहेb अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
याशिवाय, एका स्वतंत्र प्रकरणात स्वतःच्याच पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याकडूनच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला रंगेहात पकडून त्यांना याच प्रकरणात पोलिस कोठडीची हवा देखील खावी लागली होती. या प्रकरणामुळे पोलिसांची चांगलीच नाचक्की राज्यभर झाली होती मारुती शेळकेवर एक दोन नाही तर अनेक गंभीर आरोप आहेत गंभीर आरोप असून त्याची अनेक प्रकरणाची चौकशी पोलीस दरबारीच प्रलंबित आहे.
अशा गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांना पुन्हा जिल्ह्यातील महत्त्वाच्या (क्रीम पोस्टिंग) ठिकाणी नियुक्ती देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मारुती शेळके यांनी आता नुकत्याच झालेल्या स्पा सेंटरवर कार्यवाही मध्ये मुख्य भूमिका बजावली त्या पोलीसकार्यवाही वरअनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून मारुती शेळके चा आणखी एक नवा कारनामा यानिमित्ताने उघड होणार अशी चर्चा सध्या सुरू आहे
तर दुसरीकडे, शहर पोलीस ठाण्यात कार्यरत राहिलेले आणि विविध वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असलेले पोलीस निरीक्षक शकील शेख यांची कळंब शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आल्यानेही वाद निर्माण झाला आहे.
मारुती इटाळकर खून प्रकरण यात प्रामुख्याने तपास कामी संशयाची भूमिका घेतल्याने अडचणीत आलेले तसेच शहरातील चंदन तस्करी प्रकरण, काही आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप तसेच एका प्रकरणांमधील आरोपींकडून पोलिस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून लाच मागणी झाल्याच्या प्रकरणांमध्ये त्यांचे नाव चर्चेत आले होते. एका प्रकरणात एका पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई झाल्याची आणि संबंधित प्रकरणांमध्ये वरिष्ठ पातळीवर चौकशी झाल्याची माहितीही समोर आली होती.
सगळ्यात महत्त्वाचं इटळकर खून प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले, इटळकर कुटुंबीयांनी पोलीस तपास प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत अनेक वेळा कार्यवाहीसाठी आंदोलन देखील केले. या प्रकरणाची चौकशी प्रलंबित असताना या ही वादग्रस्त अधिकाऱ्याला पुन्हा ‘क्रीम पोस्टिंग’ देण्यात आल्याने प्रशासनाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी अशा वादग्रस्त पोलीस निरीक्षकांना कोणत्या आधारे नियुक्ती केल्या आहेत असे सातत्याने प्रश्न विचारले जात असून, या निर्णयांमागील कारणांवर चर्चा सुरू आहे.
दरम्यान, या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हा पोलीस दलातील अंतर्गत कार्यपद्धती, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चा सुरू झाली आहे.
लोकविचार सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786


