• होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
sarvsamanylokvichar.com
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य
No Result
View All Result
sarvsamanylokvichar.com
No Result
View All Result

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

wp@dktechs.in by wp@dktechs.in
March 3, 2026
in राजकारण
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सहलीवरच रंगली विजयाची होळी १३ मार्चपूर्वीच महायुतीचा जल्लोष!

जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीआधीच गुलाल उधळला, जिल्हा परिषदेत कमळ फुलणार असल्याचे स्पष्ट संकेत

धाराशिव | लोकमदत न्यूज

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना उलटत असताना सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. ७ फेब्रुवारीला मतदान व ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य फुटफुटीचा धोका टाळण्यासाठी महायुतीचे नवनिर्वाचित सदस्य अज्ञातस्थळी सहलीवर पाठवले आहेत. सत्तेची समीकरणे जुळवण्यासाठी सुरू असलेल्या या हालचालींमध्ये होळीचा रंगही मिसळला असून, सहलीवर असलेल्या सदस्यांनी एकमेकांना गुलाल लावत विजयाची होळी (धुळवड) मोठ्या उत्साहात साजरी केली. या रंगोत्सवाचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सदस्यांमधील एकजूट स्पष्ट दिसून येत आहे.
१३ मार्च रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी आणि आपला गट अभेद्य राखण्यासाठी महायुतीने सदस्यांना थेट निवडीच्या दिवशीच सभागृहात आणण्याची रणनीती आखल्याचे बोलले जाते. निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून सदस्य फुटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी तथा भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई पाटील अध्यक्षपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महाविकास आघाडी प्रभाव टाकण्याच्या स्थितीत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच ‘कमळ’ फुलण्याचे संकेत मिळत आहेत.
निवडणुकीनंतर सदस्यांना एकत्र ठेवण्याचे नियोजन काटेकोरपणे राबवण्यात आल्याचे सांगितले जात असून, १३ मार्चला होणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत सहलीवरील राजकीय हालचाली आणि विजयाचा जल्लोष सुरूच राहणार, असे चित्र सध्या दिसून येत आहे.
लोकमदत न्यूज सत्य शोधून लिहिण्याची ताकद संपादक अमजद सय्यद 8390088786

Previous Post

नगराध्यक्ष नेहा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्मशानभूमीत स्वच्छतेचा संकल्प पूर्ण….दत्ता पेठे यांच्या पुढाकारातून यशस्वी श्रमदान मोहीम

Next Post

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Next Post

वेळ प्रसंगी विरोधात बसू पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही - पालकमंत्री प्रताप सरनाईक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent Posts

  • नळदुर्ग महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘वाचन संकल्प’ व ‘ग्रंथ प्रदर्शन’ उत्साहात
  • मोदी सरकारला जनताच मुळासकट उखडून फेकेल – अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उत्तर प्रदेशचे सहप्रभारी
  • संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची इरफान कुरेशी यांनी घेतली सदिच्छा भेट
  • काँग्रेस गटनेते सिद्धार्थ बनसोडे व अक्षय जोगदंड यांचा भाजपमध्ये प्रवेश जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णींच्या हस्ते सत्कार
  • धाराशिवमध्ये राजकीय भूकंप! ठाकरे गटाला मोठा धक्का विद्यमान पाच नगरसेवक करणार भाजपमध्ये प्रवेश.!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025

Categories

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिक्षण
  • सामाजिक
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • होमपेज
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • सामाजिक
  • क्राईम
  • कृषी
  • शिक्षण
  • आरोग्य

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.